बाप्पा, आम्हाला बळ दे !

गणपती बाप्पा, तू केवळ देव नाहीस, तू विचार आहेस, तू प्रेरणा आहेस. आज गोव्यात सत्याची गरज आहे, विवेकाची गरज आहे, आणि एकजुटीची गरज आहे. तू आम्हाला मार्ग दाखव की आम्ही खोटेपणाला नकार देऊ, भयाला हरवू, आणि गोव्यासाठी उभं राहू.

गोवा, निसर्गसंपन्न, सांस्कृतिक वारशाने समृद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या जागरूक असलेला प्रदेश. आज अनेक स्तरांवर आव्हानांना सामोरा जात आहे. राजकीय बजबजपुरी, सामाजिक ताणतणाव आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सामान्य जनतेच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण श्री गणपती बाप्पाकडे केवळ आरास, उत्सव आणि परंपरेपुरते नव्हे, तर एक सामाजिक आणि राजकीय मार्गदर्शक म्हणून प्रार्थना करायला हवी. बुद्धी दे, विवेक दे, खोटेपणाचा भेद करण्यासाठी गणपती हे बुद्धीचे प्रतीक. आज गोव्यातील राजकारणात खोटेपणा, दिशाभूल करणारे आश्वासने आणि जनतेच्या भावनांशी खेळ करणारे प्रवाह वाढत आहेत. हे बाप्पा, तू आम्हाला अशी बुद्धी दे की आम्ही प्रचाराच्या आंधळ्या चमकात हरवू नये. तू आम्हाला विवेक दे, जेणेकरून आम्ही खरे आणि खोटे यामधील फरक ओळखू शकू. भीती दूर कर, सत्यासाठी आवाज उठवण्याचं बळ दे गोव्यातील अनेक नागरिक आज भयग्रस्त आहेत. सामाजिक दबाव, राजकीय दडपशाही आणि आर्थिक अस्थिरतेमुळे. हे विघ्नहर्त्या, तू आम्हाला बळ दे, जेणेकरून आम्ही उघडपणे व्यक्त होऊ, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि सत्याची कास धरू. तुझ्या सोंडेइतकी लवचिकता आणि तुझ्या पायांइतकी ठाम भूमिका आम्हाला दे.
गोव्यासाठी एकजूट, निसर्ग, संस्कृती आणि हक्कांचं रक्षण गोवा केवळ पर्यटनस्थळ नाही, तो आमचा आत्मा आहे. त्याच्या निसर्गाचं रक्षण, स्थानिक संस्कृतीचं जतन, आणि जनतेच्या हक्कांचं संरक्षण हे प्रत्येक गोमंतकवासीयाचं कर्तव्य आहे. हे गणाधीश, तू आम्हाला पक्षभेद विसरून एकत्र येण्याची प्रेरणा दे. गोव्यासाठी, गोमंतकासाठी. शांत हास्य दे, अस्थिरतेतही स्थिर राहण्यासाठी बाजार असो वा राजकारण, अस्थिरता ही नित्याची. पण तू जसा शांत हास्याने सगळं पचवतोस, तसंच आम्हालाही तू संयम दे. तू आम्हाला शिकव की संघर्षातूनच परिवर्तन जन्म घेतं. गणपती बाप्पा, तू केवळ देव नाहीस, तू विचार आहेस, तू प्रेरणा आहेस. आज गोव्यात सत्याची गरज आहे, विवेकाची गरज आहे, आणि एकजुटीची गरज आहे. तू आम्हाला मार्ग दाखव की आम्ही खोटेपणाला नकार देऊ, भयाला हरवू, आणि गोव्यासाठी उभं राहू.

  • Related Posts

    सत्तेच्या नशेला आवरा

    लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही. ती प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, स्वतंत्र प्रसारमाध्यमांमुळे, निर्भय सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आणि निष्पक्ष प्रशासनामुळे मजबूत होते. गोव्यातील राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अधिक धूसर होत…

    आनंदोत्सव की आत्मपरीक्षण ?

    नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या आणि गोव्यातील भाजप सरकारच्या १४ वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. देशभरात भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण…

    You Missed

    भाजयुमोच्या तक्रार नाट्याचा अतिरेक

    भाजयुमोच्या तक्रार नाट्याचा अतिरेक

    सत्तेच्या नशेला आवरा

    सत्तेच्या नशेला आवरा

    13/06/2026 e-paper

    13/06/2026 e-paper

    FSSAI Bans Use of Metallic Pins and Wires in Food Packaging, Orders Immediate Compliance

    FSSAI Bans Use of Metallic Pins and Wires in Food Packaging, Orders Immediate Compliance

    Student Delegation Meets Director of Higher Education Over NEP Result Delays, Examination Issues

    Student Delegation Meets Director of Higher Education Over NEP Result Delays, Examination Issues

    12/06/2026 e-paper

    12/06/2026 e-paper