विश्वजीतबाबांचा रुद्रावतार!

जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे तसेच सामाजिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमाने एक जाळे विणून, योग्य संवाद आणि समन्वयाच्या आधारे एक प्रभावी प्रणाली निर्माण करणे शक्य आहे.

आज आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली. तिथे कॅज्युअल्टी विभागातील आरोग्य अधिकाऱ्याकडून एका रूग्णाला मिळालेल्या वागणुकीबद्दल त्यांनी रुद्रावतार धारण केला आणि संबंधित डॉक्टरला निलंबितही केले. डॉक्टर किंवा इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण असतो हे खरे आहे, पण रुग्णांशी चांगले वागणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांनी त्यांच्या मग्रुर वागणूकीबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु हे प्रकार जर संपूष्टात यायचे असतील तर या विषयाच्या मुळाशी जाऊन हा विषय कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गोमेकॉच्या व्यवस्थापनात सुधारणा घडवणे अत्यावश्यक आहे.
गोवा मेडिकल कॉलेज हा गोमंतकीयांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे. केवळ गोमंतकीयच नव्हे तर शेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील कारवार जिल्हाही वैद्यकीय सुविधांसाठी गोमेकॉवर अवलंबून आहेत. मोफत उपचार, औषधे, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा यामुळे गोमेकॉ सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा आधारवड ठरला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली हृदयशस्त्रक्रिया विभाग आणि अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्यामुळे गोमेकॉ आता केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे तर विशेष रुग्णांचेही एक महत्त्वाचे उपचार केंद्र बनले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर कारभाराच्या चुकांबाबत टीका होते, परंतु त्यांनी गोमेकॉमध्ये अनेक सकारात्मक सुधारणा घडवून आणल्या आहेत, हे मान्य करावे लागेल. जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे आणि सामाजिक आरोग्य केंद्रे यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना सरकारची, विशेषतः मुख्यमंत्र्यांची सहकार्याची गरज आहे. ओपीडी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. पहाटे चार वाजता रुग्ण ओपीडीमध्ये नंबर मिळवण्यासाठी रांगेत उभे असतात, ही प्रथा बदलण्याची गरज आहे. ऑनलाइन ओपीडी व्यवस्था किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून फोनद्वारे भेटीचे नियोजन करण्याची नवी प्रणाली आणल्यास रुग्ण आणि डॉक्टर दोघांना फायदा होईल. तसेच, रुग्णांना त्यांच्या जवळच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणी करून आवश्यक असल्यास गोमेकॉत पाठवता येईल, यामुळे रुग्णांचे हेलपाटे आणि वेळेचा अपव्यय टाळता येईल.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून गोमेकॉ आणि जिल्हा इस्पितळांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ करता येईल. यासाठी आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होऊन आरोग्यसेवेचा योग्य लाभ मिळेल.

  • Related Posts

    भाजपातील अस्वस्थता

    आता भाजपविरोधात बंडखोरीचे धाडस करणे सोपे नाही, तरीही या बंडखोरीचा उपयोग करून घेण्यात विरोधक सक्षम आहेत काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. “अब की बार, ४०० पार” हा भाजपचा २०२४ च्या…

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    You Missed

    भाजपातील अस्वस्थता

    भाजपातील अस्वस्थता

    कटमगाळ दादाला हात लावणार नाही

    कटमगाळ दादाला हात लावणार नाही

    29/06/2026 e-paper

    29/06/2026 e-paper

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat