राज्यातील आल्वाराधारक धास्तावले

नियमीतीकरणाच्या नावाखाली जमिनींवर डोळा

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या नावाखाली राज्यातील आल्वारा जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची कुणकुण लोकांना लागली आहे. पोर्तुगीज काळात लागवडीसाठी लीज पद्धतीवर दिलेल्या या जमिनींची अधिकृत मालकी लीजधारकांना देण्याचे टाळून, त्या जमिनी ताब्यात घेण्यासाठीच सरकारने ही दुरुस्ती केली असल्याचे बोलले जात आहे. याविरोधात सत्तरी, पेडणे आणि धारबांदोडा तालुक्यात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत उघडपणे आल्वारा, मोकासो आदी जमिनी सरकारी असल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आल्वारा जमिनींची मालकी लीजधारकांना देण्याचे वचन दिले होते. माजी महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी त्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीअंतर्गत लीजधारकांनी क्लास-१ आणि क्लास-२ मालकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, आवश्यक कागदोपत्री दाखल्यांअभावी हे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.
या अर्जांचा निकष लावण्याआधीच सरकारने सरकारी जमिनीवरील अनियमित बांधकामे कायदेशीर करण्याच्या नावाखाली उर्वरित जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातल्याचे आरोप होत आहेत.
आल्वारा जमिनी या लागवडीसाठी दिल्या गेल्या होत्या. दहा वर्षे लागवडीनंतर या जमिनींची मालकी लीजधारकांना देण्याची तरतूद आल्वारा कायद्यात आहे. यासाठीचा फॉर्म भरल्यानंतर मालकी मिळणे अपेक्षित आहे. या जमिनी सामान्य, गरीब कुटुंबांना प्राप्त झाल्यामुळे काही सरकारी अधिकारी आणि राजकारणी या लोकांची दिशाभूल करून जमिनी हडप करण्यासाठी कार्यरत असल्याची टीका सुरू आहे.
विविध उपजिल्हाधिकारी कार्यालयांतील अधिकारीच आल्वारा जमिनींचे व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या जमिनींबाबत राज्यात अनेक छुपे करार करून व्यवहार सुरू असल्याचीही माहिती मिळाली आहे.

  • Related Posts

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    ५६ गावांच्या शहरीकरणाची अधिसूचना मागे गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या महसूल खात्याने ५६ गावांना “शहरी क्षेत्र” घोषित करण्याच्या प्रस्तावाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने महसूल खात्याने अखेर ही अधिसूचना मागे…

    Congress Calls Withdrawal of Urbanisation Notification a Victory for the People

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has welcomed the Revenue Department’s decision to withdraw the notification proposing the urbanisation of 56 villages, describing it as a major victory for the people of Goa and a setback for the BJP Government.

    You Missed

    27/06/2026 e-paper

    27/06/2026 e-paper

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    Congress Calls Withdrawal of Urbanisation Notification a Victory for the People

    Congress Calls Withdrawal of Urbanisation Notification a Victory for the People

    GPCC Leadership Reviews Organisation, Plans Statewide Grassroots Outreach

    GPCC Leadership Reviews Organisation, Plans Statewide Grassroots Outreach

    Gomantak Bhandari Samaj Condemns Chief Secretary’s Conduct Towards St. Andre MLA Viresh Borkar

    Gomantak Bhandari Samaj Condemns Chief Secretary’s Conduct Towards St. Andre MLA Viresh Borkar