कुठे आहे ‘इंडिया’ आघाडी?

आरजीच्या आक्रमकपणाची लोक आठवण काढतात खरे पण ही आठवण केवळ या क्रांतीकारकांच्या कामाकडे मनोरंजन म्हणून पाहण्यासाठीची आहे की खरोखरच गोव्याला या क्रांतीकारकांची खरी गरज असल्याच्या भावनेतून आहे, हे कोण सांगणार ?

लोकसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेले घटक लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत, यावरून या आघाडीची विश्वासाहर्ता किती पोकळ आहे, हेच दिसून येते. अशावेळी लोकांनी या आघाडीवर विश्वास ठेवून सत्ताधारी घटकांशी पंगा कसा घ्यावा, याचे उत्तर विरोधकांचे नेते देऊ शकणार काय. राज्यात भुरूपांतरे, नोकरी विक्री प्रकरणे, मेगा प्रकल्प तसेच सर्वंत्र ठिकाणी सुरू असलेले वादग्रस्त जमीन विक्री व्यवहार सुरू असताना विरोधक म्हणून सर्व आघाडीचे घटक अपयशीच ठरल्याचे दिसते. अर्थात ३३ विरूद्ध ७ हा आकडा खूपच मर्यादित आहे हे जरी मान्य असले तरी प्रामाणिकता आणि शुद्ध हेतू असल्यास या नगण्य आकड्याचाही फरक पडणार नाही. पण ही प्रामाणिकताच आघाडीच्या विश्वासाहर्तेची मोठी बाधा आहे. विरोधी काँग्रेस पक्षातील आमदार आणि संघटनेत दोन गट पडले आहेत. एक गट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहे तर दुसऱ्या गटाचे प्रमुख शत्रू विश्वजीत राणे आहेत. या दोन्ही गटांत अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू आहे. भूरूपांतराचे सुत्रधार विश्वजीत असल्यामुळे विरोधकातील अनेकांची हवाच गेली आहे तर नोकरी विक्री प्रकरणात मुख्यमंत्रीच अधिक लक्ष्य बनत असल्यामुळे एक गट थंडावला आहे. सत्ताधारी पक्षाचे एक आमदार आपल्याच एका कार्यकर्त्याला फोनवर धमकावत असतानाचा आणि एका मंत्र्याला आपण ७ लाख रूपये दिल्याचा दावा करत असल्याचे ऑडिओ रिलीज झाले आहे. या ऑडीओवर काँग्रेसची काहीच प्रतिक्रिया नसणे हे कशाचे द्योतक आहे. त्या ऑडीओमध्ये उल्लेख झालेल्या मंत्र्यांची विरोधकांशी मैत्री असल्यामुळेच ते प्रकरण त्यांनी दुर्लक्षीत केले असावे, अशी शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव हे तर भूमीगत असल्यागत कुठेच दिसत नाहीत. त्यांचे वडिल आणि माजीमंत्री जॉकीम आलेमाव हे आजारी असल्यामुळे ते त्यांची काळजी वाहत आहेत,अशी खबर आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते या नात्याने आपली कौटुंबिक जबाबदारी आणि संविधानिक जबाबदारी याची सांगड घालण्याची परिपक्वता त्यांना अवलंबवावीच लागणार आहे. हळदोण्याचे आमदार कार्लूस फरेरा आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी चक्क विश्वजीतांच्या प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र देणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. या उभयतांनी त्याचा नकार केला नाही, याचा अर्थ त्यांची भूमीका स्पष्ट आहे. विजय सरदेसाई हे आपल्यापरीने आक्रमक विधाने करतात पण भाजप सरकारातील कित्येकांकडे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे ते किती थरापर्यंत जाऊन सत्ताधाऱ्यांशी पंगा घेणार, याबाबतही लोक साक्षंक आहेत. आम आदमी पार्टीचे दोन आमदार प्रयत्न करताना दिसतात पण पक्षाचे निमंत्रक एड.अमित पालेकर हे वकिली करत असताना राज्यातले बडे बिल्डर आणि राजकारणी हे त्यांचे क्लाईंट होते. आता सरकारशी दोन हात करताना या क्लाईंटचे संबंध आड येऊ शकतात,असाही संशय लोकांना वाटतो. आरजीपी हा पक्ष इंडिया आघाडीचा घटक नाही. मनोज परब अज्ञातवासात गेल्यानंतर आमदार विरेश बोरकर यांचाही आवाज मंदावलेला दिसतो. आरजीच्या आक्रमकपणाची लोक आठवण काढतात खरे पण ही आठवण केवळ या क्रांतीकारकांच्या कामाकडे मनोरंजन म्हणून पाहण्यासाठीची आहे की खरोखरच गोव्याला या क्रांतीकारकांची खरी गरज असल्याच्या भावनेतून आहे, हे कोण सांगणार ?

  • Related Posts

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    You Missed

    15/05/2026 e-paper

    15/05/2026 e-paper

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper