राष्ट्रीय पक्षांकडून जमिनींची दलाली

आरजीपीचे आमदार विरेश बोरकर गरजले

पणजी,दि.५ (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीत सामील न होता आरजी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडि आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, आम आदमी पार्टी आदींनी आरजी पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आता दिल्ली विधानसभा निवडणूकीत इंडि आघाडीतून बाहेर पडून आम आदमी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करून भाजपची बी टीम असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप आमदार विरेश बोरकर यांनी केला.
राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल
गोव्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल. राष्ट्रीय पक्षांचा आधार घेऊन दिल्लीवाले इथल्या जमिनींची दलाली करत आहेत. सत्तेच्या आधारे इथल्या जमिनींचा व्यवहार आणि परप्रांतीयांना सोयीस्कर कायदे आणि कायदे दुरूस्ती करून त्यांना सांभाळण्याचे प्रकार सुरू आहेत. मुळ गोंयकारांचे विषय अजूनही खितपत पडले आहेत. गोंयकारांचे विषय कायमस्वरूपी सोडवण्याची ताकद या पक्षांत राहीलेली नाही आणि त्यामुळे राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षाचीच गरज आहे. आरजी पक्षाची स्थापनाच यासाठी झालेली आहे. राज्याचे हीत जपतानाच देशाचे राष्ट्रीयत्व जपण्यासाठी आरजीचे क्रांतीकारी काम करत आहेत,असे विरेश बोरकर म्हणाले.
युवकांची घोर निराशा, तरिही…
राज्याला भ्रष्ट भाजप, काँग्रेस आदींच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या नोकऱ्या, व्यवसायांना बाजूला सारून आरजीच्या क्रांतीकारकांनी जागृतीचे रण पेटवले. विधानसभा निवडणूकीत सगळी ताकद पणाला लावून पक्ष उतरला. पण शेवटी जनतेने दिलेल्या कौलात केवळ एकच आमदार विधानसभेत पोहचू शकला. राष्ट्रीय पक्षांना दिल्लीतून निधी मिळतो. इथे जमीन आणि इतर व्यवसायात गुंतलेल्या परप्रांतीय गुंतवणूकदारांकडूनही या पक्षांना फडिंग मिळते. हा निधी वापरून हे पक्ष निवडणूका लढवत असतात. आरजी पक्षाला राज्य, देश आणि विदेशातील गोमंतकीयांनी मदत केल्यामुळेच निवडणूकीतील खर्च करता येणे शक्य झाले, परंतु हा खर्च राष्ट्रीय पक्षांकडे स्पर्धा करण्यासाठी अपुरा पडला. केवळ पैशांकडे पाहुन लोक मतदान करू लागले तर गोवा सांभाळणे कठीण बनणार असल्याचे आमदार विरेश बोरकर म्हणाले.
मनोज परब पूर्ण जोमात परतणार…
आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब कुठे आहेत,असा सवाल सगळेजणच करतात. सहजिकच आहे कारण मनोज परब याने आरजीच्या माध्यमातून केलेली चळवळ लोकांना माहित आहे. पक्षाच्या रणनितीचा भाग म्हणूनच सध्या मनोज परब सक्रीय दिसत नाही. परंतु हा वाघ पुन्हा जोमाने आणि नव्या उर्जेने प्रवेश करणार आहे. आरजीचे क्रांतीकारी गोवा वाचवण्यासाठी पुन्हा जोमाने राजकीय रणांगणात उतरतील आणि आपला गोवा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा जीवाची बाजी लावतील,असेही आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Karapur villagers have filed a formal complaint alleging illegal construction of compound walls by M/s Errichter Infra Pvt. Ltd. in Survey Nos. 176/1 and 148/0, demanding demolition and restoration of approved plans due to deviations and blocked access routes.

    Goan Talent Shines Nationally

    Sayee Manesh Gawas, a 13-year-old artist from Goa, secured the First Prize in Hindi Monoact at the National Art Talent Search (NATS) 2026. She has also been selected for the 16th Cultural Olympiad of Performing Arts 2026, bringing national and international recognition to the state.

    You Missed

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Goan Talent Shines Nationally

    Goan Talent Shines Nationally

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Democracy Dies When Citizens Fear to Speak

    Democracy Dies When Citizens Fear to Speak

    विश्वजीत राणे समर्थकाच्या
    अनधिकृत बांधकामाला नोटीस

    विश्वजीत राणे समर्थकाच्या <br>अनधिकृत बांधकामाला नोटीस

    App-Based Taxi Promotion Against Interests of Local Taxi Operators: Yogesh Govekar alias Mogembo

    App-Based Taxi Promotion Against Interests of Local Taxi Operators: Yogesh Govekar alias Mogembo