बटेंगे तो खत्म होंगे…

गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

कष्ट, मेहनत, संघटना आणि चिकाटी या बळावर निवडणूका जिंकण्याची संस्कृती काँग्रेस पक्षात नाही. देशात स्वातंत्र्य चळवळीचा वारसा खांद्यावर घेऊन राजकारणात यश मिळवलेल्या काँग्रेसने आपली स्वतंत्र संघटना, विचारधारेचा प्रसार आदींसाठी विशेष लक्ष कधीच दिले नाही. सत्ता ही कायम आपल्याकडेच राहणार असा काहीसा भ्रम या पक्षाला झाला आणि त्याचे पर्यावसान म्हणून की काय आता एकापाठोपाठ एक राज्य काँग्रेस पक्ष सत्ता गमावत चालला आहे. महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत महायुतीने एतिहासिक विजय मिळवला आहे. बहुमताच्या १४४ जागांतील भाजपने १२० पर्यंत आघाडी घेतली आहे यावरून भाजपने एकहाती हे राज्य आपल्या कब्ज्यात मिळवले आहे. प्रचंड मेहनत, रणनिती, संघटना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची नेहमीच ताकद राहीलेली आहे. एवढे करून आघाडी सरकारचा फॉर्म्यूलाही भाजपने यशस्वी करून दाखवत सत्तेसाठी सोबत आणलेल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेणे आणि त्यांना बरोबर ठेवणे हे भाजपलाच जमलेले आहे. भाजपने स्वबळावर बहुमताच्या जवळील आकडा पार केलेला असला तरी शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाला सोबतीला घेऊन त्यांनी नकळतपणे विरोधकांना कमकुवत बनवले हीच तर त्यांची रणतिनी. सर्वांत मोठा पक्ष या नात्याने सरकारचे नेतृत्व भाजपच करणार आहे आणि इतर सोबतींना सत्तेत चिकटून राहण्यासाठी भाजपची हुजरेगिरी मान्य करावी लागेल, हे देखील तेवढेच खरे. लोकसभा निवडणूकीच्या काळात इंडिया आघाडीचा फॉर्म्यूला वापरून काँग्रेसने कसेबसे आपले अस्तित्व राखले खरे परंतु भाजपला पराभूत करण्यासाठी इतरांना सोबत घेण्याबाबत काँग्रेसची कजुंषी काही लपून राहीलेली नाही. पक्षाच्या नेत्यांना अजूनही स्वबळाच्या ताकतीचा घमेंड आहे परंतु पक्षांतर्गत मतभेद, संघर्ष आणि पाय ओढण्याची जुनी संस्कृती तशीच असल्याने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची सवयच काँग्रेसला लागून राहीलेली आहे. कर्नाटकात सत्ता गमावल्यानंतर भाजपने महाराष्ट्र काबीज करण्याचा चंगच बांधला होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्राच्या भवितव्याचा जयघोष करणाऱ्या ठाकरेंना स्वतःला एकत्र येणे जमत नाही तिथे विरोधकांना ते एकत्र कसे काय आणू शकतील. उध्दव आणि राज ठाकरे यांनी खरेच महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा यासारखा दुसरा सुवर्णक्षण असूच शकत नव्हता. शरद पवारांचे आता वय झाल्यामुळे अजित पवारांना पुढील राजकीय भवितव्यासाठी त्यांच्या कलाने वागणे परवडणारे नव्हते आणि एकनाथ शिंदे यांनी तर ठाकरेंच्या पक्षातील वर्चस्वालाच सुरूंग लावून मराठी माणसाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे घेतली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने इतर भाजप विरोधकांनाही जुळवून घ्यावेच लागेल अन्यथा बटेंगे तो खत्म होंगे, हे काँग्रेसने आता लक्षात घ्यायला हवे. गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांत अंतर्गत स्पर्धा आहेत. या स्पर्धांना दोन्ही गटांकडून खतपाणी घालण्यात येईल आणि त्यातून कोण बाजी मारतो यावरच अधिवेशनाचा निकाल ठरणार आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

    झारीतील शुक्राचार्य कोण?

    चिंबलातील युनिटी मॉलविरोधी आंदोलन, आझाद मैदानावरील आंदोलन आणि आता मिराबाग येथे सुरू असलेले आंदोलन या सगळ्यांकडे पाहता या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकारातीलच काही नेते सरकारातीलच आपल्या प्रतिस्पर्धी किंवा पक्षासाठी निरुपयोगी…

    You Missed

    05/03/2026 e-paper

    05/03/2026 e-paper

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    04/03/2026 e-paper

    04/03/2026 e-paper

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार