बेकायदा घरे वाचवण्यासाठी प्रसंगी कायदा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून राज्यातील बेकायदा बांधकामासंबंधी जारी केलेल्या निवाड्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या लोकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या प्रकरणी प्रसंगी ही घरे वाचवण्यासाठी सरकार नवा कायदा आणू शकते, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निवाडा दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी यासंबंधीची स्वेच्छा दखल घेतली होती. या स्वेच्छा दखलीच्या याचिकेवरील हा निवाडा खंडपीठाने दिला आहे. या निवाड्यानुसार राज्यातील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार पंचायत, पालिकांमध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याने लोकांत घबराट सुरू झाली आहे.
मुळातच बेकायदा आणि अनधिकृत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा कायद्यानुसार विचार करावा लागणार आहे. कायद्याचे पालन करणाऱ्यांना याबाबत घाबरण्याचे कारणच नाही. तरीही या निवाड्याचा परिणाम सर्वसामान्यांवर उद्भवत असल्यास सरकार प्रसंगी नवा कायदा आणून त्यांना संरक्षण देण्याबाबतचा विचार करेल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. हा निवाडा जाहीर होऊन आठवडा उलटला तरीही सरकारकडून काहीच भाष्य झाले नसल्याने त्यांनी सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. आज विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्टीकरण देत यासंबंधी लोकांना अवगत केले.

आज अर्थसंकल्प सादर होणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज ४.३० वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा ते करतात तसेच खातेनिहाय कोणत्या योजना ते जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • Related Posts

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    ‘सीईओ’ च्या कानउघडणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) पणजी मतदारसंघात ३० पैकी २८ बुथस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) अचानक बदली करण्यात आल्याचे प्रकरण सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीचे एल्वीस गोम्स यांनी बरेच लावून…

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) कारापूर-साखळी येथील लोढा कंपनीच्या वन गोवा पंचतारांकित प्रकल्पासाठी विक्री झालेल्या जमिनीच्या मालकीवरून केरी-सत्तरी येथील राणे कुटुंबात भाऊबंदकी सुरू आहे. या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    13/06/2025 e-paper

    13/06/2025 e-paper

    “दया, कुछ तो गडबड है…”

    “दया, कुछ तो गडबड है…”

    12/06/2025 e-paper

    12/06/2025 e-paper

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    न्यायदानात गोव्याची घसरण

    न्यायदानात गोव्याची घसरण
    error: Content is protected !!