केवळ १० वर्षांत गोव्याचा कायापालट

गोवा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांकडून ‘डबल इंजिन’ चा जयघोष

पणजी,दि.१९(प्रतिनिधी)

गोव्याचा विकास मागील ५० वर्षांत जो होऊ शकला नाही तो विकास फक्त १० वर्षांत डबल इंजिन सरकारने करून दाखवला,असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तीदिन राज्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रात गोवा आकाशझेप घेणार असल्याचेही ते म्हणाले.
गोवा मुक्तीदिन सोहळ्यात झेंडा वंदन केल्यानंतर ते गोमंतकीयांना संबोधीत करत होते. यापूर्वीही राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार राहीले आहे परंतु त्याचा काहीच उपयोग राज्याला होऊ शकला नाही. गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गोव्याचा कायापालट होऊ शकला,असे ते म्हणाले. पुढील वर्षभरात १७ हजार लखपती दीदी तयार करण्याचे काम सुरू आहे. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात क्रांती घडल्याचे सांगून सरकारला बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यामुळेच निष्फळ ठरत असल्याचे ते म्हणाले.
सामाजिक एकोपा जपा
आपला गोवा शांतीप्रिय समजला जातो. पर्यटनात आदरातिथ्य हाच आपल्या यशाचा मंत्र आहे. ती सामाजिक समरसता आणि एकोपा जपण्याची जबाबदारी गोमंतकीयांची आहे. हर घर जल, हर घर शौचालय, हर घर सडक आदी योजना राबवणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. आगामी काळात राज्यातील ग्रामिण भागांतही पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. ग्रामिण भागात ४ जी नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी टॉवर उभारण्याची कामे सुरू होणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.

या’ विधवांना आता मिळणार ४ हजार
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मोठे अपत्य २१ वर्षे वयाखाली असलेल्या विधवांना यापुढे महिला ४ हजार रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. दयानंद सामाजिक योजनेसाठीचे वार्षिक उत्पन्न आता २४ हजार रूपयांवरून दीड लाख रूपये केले आहे. ४ हजार प्रतीमहिना मिळणाऱ्या विधवांना गृह आधार योजनेचा लाभ मिळणार नाही. यासंबंधीची अधिसूचना सरकारने जारी केली आहे.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival