मडकईकरांच्या बॉम्बगोळ्याने भाजप हादरला

विरोधकांकडून चौकशीची मागणी, सरकारची अब्रु वेशीवर

पणजी,दि.५(प्रतिनिधी)-

कुंभारजुवेचे माजी आमदार आणि माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी केलेल्या सनसनाटी विधानामुळे भाजपच्या तंबूत अस्वस्थता पसरली आहे. सरकारातील बहुतेक मंत्री पैसे करण्यात व्यस्त आहेत, आपण एका कामासाठी २० लाख रूपये मोजल्याचे विधान करून त्यांनी सरकारची बेअब्रू केल्याने पक्षाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली आहे. पक्षातील काही मुळ कार्यकर्ते मात्र या विधानामुळे बरेच खूश असून कुणीतरी हे उघडपणे बोलण्याचे धाडस केले,असे ते खाजगीत बोलत आहेत.
मडकईकर पोहचलेच कसे?
सध्याच्या परिस्थितीत राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असलेले माजीमंत्री पांडुरंग मडकईकर हे अचानकपणे बाहेर पडून थेट बी.एल.संतोष यांना भेट देतात. भेट दिल्यानंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना आपल्याच सरकारच्या विरोधात गंभीर आरोप करतात, हे नेमके घडलेच कसे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सरकारातील काही मंत्र्यांतर्गत सध्या धुसफुस सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरोधात तक्रारी पोहचवण्यासाठीही स्पर्धा सुरू आहे,अशीही माहिती प्राप्त झाली आहे. बी.एल.संतोष यांच्या गोवा भेटीची संधी साधून मडकईकरांमार्फत सरकारची धिंड काढण्याची ही योजना पक्षातीलच काही लोकांनी आखली असण्याची शक्यता काही नेते व्यक्त करत आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या विधानाबाबत मात्र कुणीही छातीठोकपणे हे विधान खोटे आहे,असे म्हणणार नाही, असेही आता काही कार्यकर्ते आणि नेते म्हणू लागले आहेत.
मॉविन गुदीन्हो म्हणतात नाव घ्या
पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी पांडुरंग मडकईकर यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. मडकईकर हे माजीमंत्री आहेत. कुणावरही आरोप करताना त्यांनी नाव घेऊन तो आरोप करावा. त्यांच्या विधानामुळे सगळ्याच मंत्र्यांवर संशयाची सुई उभी झाली आहे. त्यांनी कुणाला पैसे दिले हे त्यांनी स्पष्ट करावे,असे गुदीन्हो म्हणाले.
मडकईकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी
माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी आम आदमी पार्टीचे समन्वयक एड.अमित पालेकर यांनी केली. पक्षाचे एक माजीमंत्री उघडपणे आपण पैसे दिल्याचे विधान करतात तर मग त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पक्षाच्याच नेत्याने पक्षातील भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याने बरे झाले अन्यथा विरोधकांनी हेच आरोप केले असते तर ते राजकारण करतात असे म्हणून पळ काढता आला असता,असा टोलाही एड.पालेकर यांनी हाणला.
भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता- सरदेसाई
भाजप सरकारने भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यताच दिलेली आहे. आपण याबाबत वेळोवेळी विधानसभेत बोललो आहे. पांडुरंग मडकईकर हे माजीमंत्री आहेत. त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे त्याची स्वेच्छा दखल पोलिस, दक्षता खात्याने घेऊन चौकशी करावी अन्यथा ते बोलले हे तंतोतंत खरे आहे,असाच अर्थ त्यातून निघणार असा टोला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हाणला.

मुख्यमंत्री गप्प का?
पक्षाचे एक नेता आणि माजीमंत्री सरकारी मंत्र्यांवर गंभीर आरोप करतात आणि त्याबाबत सरकारात आणि पक्षात इतकी शांतता हे काय दर्शवते,असा सवाल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. बी.एल.संतोष यांच्यापुढे हा विषय ठेवला जातो. मुख्यमंत्रीही अद्याप चकार शब्द काढत नाहीत, यावरून भ्रष्टाचार हा भाजपात किती भीनला आहे, हेच कळते. या आरोपांची सखोल चौकशी व्हायलाच हवी,असेही चोडणकर म्हणाले.

भाजप भ्रष्टाचारात आकंठ बुडाली
भाजप सरकार हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. हे आता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच जाहीर केले आहे. मडकईकर यांनी या मंत्र्यांचे नाव उघड करावे जेणेकरून त्याबाबत कारवाई केली जाईल. सरकारने पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांबाबत गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी केली.

  • Related Posts

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : मोरजी येथील तेंबवाडा येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका वकिलावरील हल्ला नसून कायद्याच्या राज्यावर आणि न्यायव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला आहे,…

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या १५२ प्रश्नपत्रिका फुटींच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत, भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप गोवा…

    You Missed

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला