२ बडतर्फ, २ निलंबित, १ एफआयआर

सत्तरीतील राणे कुटुंबीयांत खळबळ

गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

आरोग्य, नगर विकास, नगर नियोजन आणि वनखाते सांभाळणारे वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी त्यांच्याच अखत्यारित खात्यांमध्ये कठोर शिस्तबदधता आणण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यात त्यांनी त्यांच्या विविध खात्यांतील एकण चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून याची सुरूवात केली आहे. दोघांचे निलंबित तर दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कर्मचारी सत्तरीतील राणे कुटुंबातीलच असल्याने आपल्याच कुटुंबातून या मोहीमेला सुरूवात केली की काय, अशी चर्चा आता सर्वंत्र सुरू झाली आहे.

कारवाईची तपशीलवार माहिती

५ मे २०२५ रोजी आरोग्य खात्याअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अन्न निरीक्षक विश्वासराव लक्ष्मणराव राणे यांना निलंबित करण्याचा आदेश संचालक श्वेता देसाई यांनी जारी केला. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून सेवेत हलगर्जीपणाचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांच्यावर केला आहे.

६ मे २०२५ रोजी गोवा वैदयकीय महाविदयालयात एमटीएस म्हणून कार्यरत असलेले धनाजीराव जयाजीराव राणे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या निलंबनाच्या आदेशात कोणतेही स्पष्ट कारण दिले गेले नाही.

त्याच दिवशी गोवा वैद्यकीय महाविदयालयातील ईसीजी तंत्रज्ञ साईली मोहनराव राणे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अपूर्वा अनंतराव राणे या दोघींना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला. हा आदेश गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिला. त्यांच्या बडतर्फीमागचे कारणही अस्पष्ट आहे.
अमित बापूसाहेब राणे यांच्या विरोधात एफआयआर

६ मे रोजी वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत वाघेरीची जमीन वन्यजीव क्षेत्र म्हणन घोषित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे स्पष्ट केले. याच वेळी, वाघेरी येथे बेकायदा रस्ते तयार करण्याच्या प्रकरणी अमित राणे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश वन अधिकाऱ्यांना देण्यात आले. अमित बापुसाहेब राणे हेही सत्तरीतील राणे कुटुंबातील सदस्य असल्याने, विश्वजीत राणे यांच्या अखत्यारीतील खात्यांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांवर झालेल्या कारवाईमुळे सरकारमध्ये आणि तालुक्यात हा विषय मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Related Posts

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे…

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 19 views
    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 13 views
    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 38 views
    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper