सरकारच्या शब्दावर अविश्वास

चिंबलकरांचे उद्या महाआंदोलन

गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ इतरत्र स्थलांतर करण्यासंबंधी पर्यटन खात्याने जारी केलेल्या पत्रकावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने लिखित स्वरूपात आश्वासन देतानाच, याठिकाणी भविष्यात कुठलाही प्रकल्प उभारला जाणार नाही, याची हमी चिंबलकरांना हवी आहे. तूर्त चिंबलकरांचे साखळी उपोषण आंदोलन सुरूच राहणार असून, शुक्रवारी दि. ३० रोजी पणजीत महाआंदोलन होईल, अशी माहिती आंदोलनाचे नेते गोविंद शिरोडकर यांनी दिली.
बुधवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंबल येथील युनिटी मॉलसंबंधी केलेल्या सर्वेक्षण अहवालावर चर्चा केली. या बैठकीवर चिंबलकरांनी बहिष्कार टाकला. बैठकीत सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पर्यटन खात्याने केवळ पत्रक जारी करून हे दोन्ही प्रकल्प स्थलांतरित करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेसंदर्भात मुख्यमंत्री किंवा पर्यटनमंत्री या दोघांपैकी कुणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वास्तविक या सर्वेक्षण अहवालासंबंधी आंदोलकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही एक दिवसाची मुदत मागितली होती. अहवालातील अनेक त्रुटींवर आंदोलकांची भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला देण्यात आला नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भूमिका अमान्य
चिंबल येथील प्रस्तावित दोन्ही प्रकल्प इतरत्र स्थलांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चिंबलकरांनी स्वागत केले. परंतु हे करत असताना सरकारने आपलीच भूमिका योग्य असल्याचा जो अट्टाहास दाखवला आहे, तो पूर्णपणे चुकीचा असल्याची टीका शिरोडकर यांनी केली. हे दोन्ही प्रकल्प तळ्यार तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत नाहीत, ही भूमिका अमान्य आहे, असेही त्यांनी जाहीर केले. सरकारने या जमिनीसंबंधी मांडलेली भूमिका पाहता भविष्यात इथे कधीही वेगळा प्रकल्प येण्याचा धोका कायम असल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.
महाआंदोलनाचा एल्गार
पणजीतील महाआंदोलन हे केवळ चिंबलातील आंदोलनापुरते मर्यादित नसून, राज्यभरातील वेगवेगळ्या विषयांवर सर्व जनता रस्त्यावर उतरणार आहे. दि. ३० रोजी पणजीत विराट महाआंदोलन होणार असून, हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत, असे चिंबलकरांनी सांगितले. या महाआंदोलनातच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून, महाआंदोलनात पुढील भूमिका जाहीर केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

  • Related Posts

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Social and environmental activist Prof. Ramrao Wagh has called upon the people of Goa to unite against the State Government’s proposal to declare 56 villages as “Urban Areas”, warning that the move would irreversibly damage Goa’s rural character, agriculture and fragile environment.

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    पेडणे,दि.२५ जून: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) वरील उगवे आणि तांबोसे दरम्यान असलेल्या तांबोसे पुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका…

    You Missed

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    25/06/2026 e-paper

    25/06/2026 e-paper

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    नामस्मरण !

    नामस्मरण !