‘चंदा-चोरी’ सूत्रधारांना कुणाचे अभय ?

अरविंद केजरीवाल यांचा आरोप
गांवकारी, दि .३ (प्रतिनिधी)

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या ‘चंदा-चोरी’ प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना नेमके कुणाचे अभय मिळत आहे, असा सवाल आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. या चोरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनभिज्ञ राहू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर नेते उपस्थित होते. श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी गोव्यातील आणि देशभरातील हिंदूंनी आनंद व भक्ती व्यक्त केली होती. मात्र या घोटाळ्याच्या उघडकीमुळे लोकांना फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्ट पंतप्रधानांनी स्वतः स्थापन केला आणि प्रत्येक सदस्य स्वतः निवडला असल्याने, त्यांना माहिती नसणे शक्य आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.
एसआयटी की धुळफेक?
श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) हे केवळ जनतेला दिशाभूल करण्यासाठी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ही निव्वळ धुळफेक असून प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
अमित शहा दर्शन का घेत नाहीत?
श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिराला भेट दिली नाही, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ८९१ दिवस उलटून गेले तरी ते तिथे पोहोचले नाहीत, याचे रहस्य काय, असा सवाल त्यांनी केला.
जमीन व्यवहारातील घोटाळ्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “२०२१ मध्ये जमीन २ कोटींना विकत घेऊन केवळ १० मिनिटांत मंदिर ट्रस्टला १८ कोटींना विकली गेली.” बांधकामातील भ्रष्टाचार, सीसीटीव्ही फुटेज डिलीट होणे, ४०% कमिशन मागणे अशा अनेक बाबी त्यांनी मांडल्या.
गुप्तचर विभागाने पंतप्रधानांना किमान १२ अहवाल दिले होते, तरीही त्यांनी मौन का बाळगले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has submitted a detailed memorandum to Governor P. S. Ashok Gajapathi Raju, expressing serious concern over the “alarming deterioration” of law and order in Goa. The memorandum highlights a rise in various crimes and calls for urgent constitutional intervention to safeguard public safety and the state’s image.

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर

    फ्लॅटधारकांना मालकी हक्क, पुनर्विकासाला चालना गांवकारी,दि १ (प्रतिनिधी) गोवा सरकारने राज्यातील हजारो फ्लॅटधारकांचे मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी, जुन्या गृहनिर्माण संकुलांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित मालकीच्या प्रश्नांवर…

    You Missed

    Vishal Pai Cacode writes to AICC leader K. C. Venugopal, raises seven questions on Goa Congress

    Vishal Pai Cacode writes to AICC leader K. C. Venugopal, raises seven questions on Goa Congress

    No split in Congress; BJP spreading false narrative to mislead voters: Tulio D’Souza

    No split in Congress; BJP spreading false narrative to mislead voters: Tulio D’Souza

    03/07/2026 e-paper

    03/07/2026 e-paper

    ‘चंदा-चोरी’ सूत्रधारांना कुणाचे अभय ?

    ‘चंदा-चोरी’ सूत्रधारांना कुणाचे अभय ?

    कुठे आहेत सा.बां. खात्याचे अभियंते ?

    कुठे आहेत सा.बां. खात्याचे अभियंते ?

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    राज्यात गुन्हेगारीचा कहर