संयमी डॉक्टरांची कबुली

राणे यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची असली तरी त्यांचा स्वभाव आणि वागणूक त्यांना या पदापासून दूर लोटत आहेत. नगर नियोजन खात्याचा कारभार पाहून लोक “सावंत परवडले, पण विश्वजीत नको” असे बोलू लागले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी देखील त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे सर्वांत मोठे यश हे त्यांच्या संयमी वृत्तीत आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. गेली सात वर्षे ते सत्तेत असून, विधानसभा आणि सभागृहाबाहेरही त्यांनी संयम राखला आहे. विरोधकांच्या प्रक्षोभक टीका आणि आरोपांनाही ते शांतपणे सामोरे जातात. त्यांच्या या गुणांमुळे विरोधक आणि टीकाकार अनेकदा थकून जातात.
मिराबागवासीयांच्या निदर्शनावेळी “त्यांना अटक करा, आत टाका” असे विधान केल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र “मी त्यांना थेट दहशतवादी म्हटले नाही, तर या प्रवृत्तीवर बोललो” असे स्पष्ट करून, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. ही प्रांजळ कबुली त्यांच्या संयमी वृत्तीचे दर्शन घडवते.
राजकीय नेत्यांवर लोक वेगवेगळ्या कारणांनी टीका करतात. काहीजण राजकीय विरोधक म्हणून टीका करतात, काहीजण वैयक्तिक नापसंतीतून आरोप करतात, तर काहीजण चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यावर अजूनही टीका होत असताना डॉ. सावंत यांची टीका होणे मोठे नाही. मात्र त्यांच्या संयमी स्वभावामुळे टीकाकारच लोकांच्या टीकेचे धनी बनतात.
एकीकडे डॉ. सावंत यांचा संयमी स्वभाव तर दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा शीघ्रकोपी स्वभाव. राणे यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची असली तरी त्यांचा स्वभाव आणि वागणूक त्यांना या पदापासून दूर लोटत आहेत. नगर नियोजन खात्याचा कारभार पाहून लोक “सावंत परवडले, पण विश्वजीत नको” असे बोलू लागले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी देखील त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात.
स्वभाव आणि व्यसन हे सहज दूर करता येत नाही. ते व्यक्तीशी इतके जोडलेले असतात की बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आत्मसंयम आणि वेदना सहन कराव्या लागतात. मुख्यमंत्री डॉ. सावंत मात्र न चुकता साखळी रविंद्र भवन येथे जनता दरबार भरवतात. असा दरबार अन्य कुणीही मंत्री भरवत नाही. लोकांच्या रांगा कायम लागलेल्या असतात. कामे झाली नाहीत तरी “आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले” यामुळे लोकांना समाधान मिळते. ही लोकाभिमुख वृत्ती त्यांना जनतेच्या जवळ नेते. मिराबागवासीयांची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माफी मागितलीच आहे. आता त्यांच्या आंदोलनाचा विषय लवकरात लवकर निकालात काढून त्यांच्या आक्रोशाला पूर्णविराम द्यावा, एवढीच अपेक्षा आहे.

  • Related Posts

    पैसा अडवा, पैसा जिरवा !

    जलस्त्रोत खाते “पाणी अडवा, पाणी जिरवा” ही आपली प्राथमिक जबाबदारी विसरून “पैसा अडवा, पैसा जिरवा” ही निती घेऊन वाटचाल करत आहे की काय, असा प्रश्न पडावा. मिराबागवासीयांच्या बंधारा विरोधी आंदोलनाला…

    विकास नेमका कुणाचा ?

    राज्यातील सत्तेच्या १४ वर्षांनंतर भाजप आमदारांनी विधानसभेत आपापल्या मतदारसंघातील लोकांच्या यशोगाथांवर बोलण्याची अपेक्षा होती. हे आमदार तर अजूनही लोकांच्या समस्या आणि अडचणीच मांडत आहेत. मग विकास नेमका झाला कुणाचा, हाच…

    You Missed

    Take Stern Action on Human Trafficking

    • By Gaonkaari
    • मार्च 11, 2026
    • 6 views
    Take Stern Action on Human Trafficking

    11/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 11, 2026
    • 26 views
    11/03/2026 e-paper

    पणजी मनपासाठी चुरस

    • By Gaonkaari
    • मार्च 11, 2026
    • 26 views
    पणजी मनपासाठी चुरस

    संयमी डॉक्टरांची कबुली

    • By Gaonkaari
    • मार्च 11, 2026
    • 27 views
    संयमी डॉक्टरांची कबुली

    10/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 10, 2026
    • 21 views
    10/03/2026 e-paper

    माकडांच्या उपद्रवाचे विधानसभेत साकडे

    • By Gaonkaari
    • मार्च 10, 2026
    • 24 views
    माकडांच्या उपद्रवाचे विधानसभेत साकडे