‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?

अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र

म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या वादात या ४६ घरांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

आत्माराम गडेकर यांची तक्रार
आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आसगांव कोमुनिदादच्या जागेत एकूण ४६ घरे उभी राहीली आहेत. या घरांच्या वसाहतीला लक्ष्मीनगर असे नाव देण्यात आले आहे. ही घरे आसगांव पंचायत क्षेत्रात येत असताना म्हापसा नगरपालिकेकडून या घरांची घरपट्टी वसुल करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हापला मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हापसा नगरपालिकेच्या लोकांनी या घरपट्टीच्या आधारे याठिकाणी बेकायदा मतपेढी तयार केल्याची टीका गडेकर यांनी केली आहे.
आसगांव पंचायतीला पत्र
या लक्ष्मीनगर वसाहतीसंबंधीचे पत्र आत्माराम गडेकर यांनी आसगांव पंचायत तथा आसगांव कोमुनिदादला केले आहे. या पत्रावरून आसगांव पंचायतीने म्हापसा नगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागीतले आहे. म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेटकर यांनी आसगांव पंचायतीला या जागेच्या अधिकारक्षेत्राबाबत सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागतील्याचे पत्र पंचायतीला पाठवले आहे. म्हापसा नगरपालिकेला सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागण्याची वेळ येणे ह्यावरूनच ही घरे म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, याबाबत पालिकेलाच खात्री नाही, हे उघड झाल्याचे गडेकर यांनी म्हटले आहे.
दक्षता खात्याकडेही तक्रार
तक्रारदार आत्माराम गडेकर यांनी बेकायदा घरांना घरक्रमांक दिल्याच्या हा विषय दक्षता खात्याकडे पोहचवला आहे. आसगांव कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक १४५ मधील उपविभाग पाडून हे क्रमांक दिले गेले आहेत. २००१ मध्ये ३३, २००२ मध्ये १, २०१५ मध्ये १ आणि २०२४ मध्ये ११ घरांना घरक्रमांक दिल्याची माहिती आणि त्यासोबत घरपट्टी पावत्याही त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आहेत.
म्हापसेकरांनो जागे व्हा- गडेकर
म्हापसा शहरात अशाच तऱ्हेने ठिकठिकाणी बेकायदा घरे, झोपडपट्टी उभारून मतपेढी तयार केली आहे. या मतपेढीच्या जोरावरच राजकारण केले जाते. या मतपेढीमुळेच आज म्हापसेकरांचे महत्व कमी होत चालले आहे. या मतपेढीच्या जोरावर म्हापसेकरांना लाचार बनवण्याचे प्रकार सुरू असून म्हापसा शहर वाचवायचे असेल आणि आपल्या ताब्यात ठेवायचे असेल तर ही बेकायदा मतपेढी तथा बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे,असे मत आत्माराम गडेकर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    वझरी- पेडणेत सोमवीर खत्रीचा प्रवेश!

    कोर्ट रिसीव्हरच्या जमीन विक्रीवरून स्थानिकांत तीव्र संताप गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील वझरी गांवात कोर्ट रिसीव्हरच्या जमीन मालकीच्या विषयावरून आधीच वातावरण स्फोटक बनले आहे. आता ह्याच कोर्ट रिसीव्हरच्या वारस…

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    महसूल, पोलिस, वन, वाहतूक, खाण अधिकारी वाटेकरी गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) रेती आणि चिरे हे बांधकामासाठी आवश्यक घटक असले तरी अधिकृत परवाने नसल्याने या दोन्हीच्या उपलब्धतेत मोठी अडचण आहे. त्यामुळे…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    25/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 25, 2025
    • 3 views
    25/04/2025 e-paper

    वझरी- पेडणेत सोमवीर खत्रीचा प्रवेश!

    • By Gaonkaari
    • एप्रिल 25, 2025
    • 3 views
    वझरी- पेडणेत सोमवीर खत्रीचा प्रवेश!

    भ्रष्टाचार विरोधी पथक हो!

    • By Gaonkaari
    • एप्रिल 25, 2025
    • 3 views
    भ्रष्टाचार विरोधी पथक हो!

    24/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 24, 2025
    • 5 views
    24/04/2025 e-paper
    error: Content is protected !!