योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

पणजी, २१ जून: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. योगाला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे साधन मानत सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी राज्यातील वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी, सार्वजनिक कर्ज आणि जनविरोधी धोरणांवर सरकारला धारेवर धरले.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना चोडणकर म्हणाले की, गेल्या जवळपास चौदा वर्षांच्या भाजप राजवटीमुळे गोव्यातील नागरिकांना महागाई, आर्थिक असुरक्षितता आणि जनविरोधी निर्णयांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला तणाव आणि अस्थिरतेमध्ये समतोल राखण्याची वेळ आली असून योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

योग ही लाखो लोकांसाठी जीवनपद्धती आणि आत्मिक साधना असताना भाजप सरकारने त्याचे वार्षिक प्रसिद्धी सोहळ्यात रूपांतर केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारची सर्वात मोठी “योगसिद्धी” म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप, वादग्रस्त कलम ३९-अ, स्मार्ट मीटरची सक्ती, ‘जॉब्स फॉर कॅश’ प्रकरणे, वाढता अमली पदार्थांचा विळखा आणि प्रचंड सार्वजनिक कर्ज या सर्व समस्यांचा भार जनतेवर टाकून स्वतः मात्र शांत राहण्याची क्षमता असल्याचा टोला त्यांनी लगावला.

रोजगारनिर्मिती, गोव्याची ओळख जपणे, अमली पदार्थांवर नियंत्रण आणणे आणि सार्वजनिक सेवा मजबूत करण्याऐवजी सरकार कार्यक्रमबाजी आणि प्रतिमा उभारणीत व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि स्थानिकांच्या हितांवर घाला घालणारी धोरणे कोणत्याही जाहिरात मोहिमेद्वारे लपवता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्याची जनता आता केवळ प्रतीकात्मक कार्यक्रमांवर समाधानी राहणार नसून उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि जनहितासाठी सातत्याने काम करणारे सरकार अपेक्षित असल्याचे सांगत चोडणकर यांनी शासनाच्या अपयशाबाबत जनतेचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे नमूद केले.

आपल्या वक्तव्याच्या शेवटी त्यांनी गोव्याच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा पुनरुच्चार करत सरकारने प्रसिद्धी आणि दिखाऊ उपक्रमांऐवजी जनतेच्या वास्तविक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.

  • Related Posts

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला,…

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    पणजी, दि. १६: गोव्यात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाची सर्वसाधारण अंमलबजावणी तात्काळ स्थगित करून त्याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार