राष्ट्रीय पक्षांकडून जमिनींची दलाली

आरजीपीचे आमदार विरेश बोरकर गरजले

पणजी,दि.५ (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीत सामील न होता आरजी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडि आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, आम आदमी पार्टी आदींनी आरजी पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आता दिल्ली विधानसभा निवडणूकीत इंडि आघाडीतून बाहेर पडून आम आदमी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करून भाजपची बी टीम असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप आमदार विरेश बोरकर यांनी केला.
राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल
गोव्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल. राष्ट्रीय पक्षांचा आधार घेऊन दिल्लीवाले इथल्या जमिनींची दलाली करत आहेत. सत्तेच्या आधारे इथल्या जमिनींचा व्यवहार आणि परप्रांतीयांना सोयीस्कर कायदे आणि कायदे दुरूस्ती करून त्यांना सांभाळण्याचे प्रकार सुरू आहेत. मुळ गोंयकारांचे विषय अजूनही खितपत पडले आहेत. गोंयकारांचे विषय कायमस्वरूपी सोडवण्याची ताकद या पक्षांत राहीलेली नाही आणि त्यामुळे राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षाचीच गरज आहे. आरजी पक्षाची स्थापनाच यासाठी झालेली आहे. राज्याचे हीत जपतानाच देशाचे राष्ट्रीयत्व जपण्यासाठी आरजीचे क्रांतीकारी काम करत आहेत,असे विरेश बोरकर म्हणाले.
युवकांची घोर निराशा, तरिही…
राज्याला भ्रष्ट भाजप, काँग्रेस आदींच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या नोकऱ्या, व्यवसायांना बाजूला सारून आरजीच्या क्रांतीकारकांनी जागृतीचे रण पेटवले. विधानसभा निवडणूकीत सगळी ताकद पणाला लावून पक्ष उतरला. पण शेवटी जनतेने दिलेल्या कौलात केवळ एकच आमदार विधानसभेत पोहचू शकला. राष्ट्रीय पक्षांना दिल्लीतून निधी मिळतो. इथे जमीन आणि इतर व्यवसायात गुंतलेल्या परप्रांतीय गुंतवणूकदारांकडूनही या पक्षांना फडिंग मिळते. हा निधी वापरून हे पक्ष निवडणूका लढवत असतात. आरजी पक्षाला राज्य, देश आणि विदेशातील गोमंतकीयांनी मदत केल्यामुळेच निवडणूकीतील खर्च करता येणे शक्य झाले, परंतु हा खर्च राष्ट्रीय पक्षांकडे स्पर्धा करण्यासाठी अपुरा पडला. केवळ पैशांकडे पाहुन लोक मतदान करू लागले तर गोवा सांभाळणे कठीण बनणार असल्याचे आमदार विरेश बोरकर म्हणाले.
मनोज परब पूर्ण जोमात परतणार…
आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब कुठे आहेत,असा सवाल सगळेजणच करतात. सहजिकच आहे कारण मनोज परब याने आरजीच्या माध्यमातून केलेली चळवळ लोकांना माहित आहे. पक्षाच्या रणनितीचा भाग म्हणूनच सध्या मनोज परब सक्रीय दिसत नाही. परंतु हा वाघ पुन्हा जोमाने आणि नव्या उर्जेने प्रवेश करणार आहे. आरजीचे क्रांतीकारी गोवा वाचवण्यासाठी पुन्हा जोमाने राजकीय रणांगणात उतरतील आणि आपला गोवा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा जीवाची बाजी लावतील,असेही आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    लोकसभेला पुरवली प्रॉपर्टी कार्डची खोटी माहिती पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचे भूमापन करून त्यांना मालकीचा दाखला प्रदान करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत गोवा सरकार सपशेल नापास…

    दोन मंत्र्यांच्या कार्यालयात ‘दिदि’गिरी!

    मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणांतून मंत्र्यांकडील सलगीचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातलेल्या महिलांचे उदाहरण ताजे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!