रितेश विरुद्ध केतन !

फोंड्यात रंगणार थरारक लढत

गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजपने अखेर फोंड्याचे नगरसेवक व माजी मंत्री स्व. रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर आणि भाजपतर्फे रितेश नाईक अशी ही लढत रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने सर्वप्रथम मगो पक्षातून आलेले डॉ. केतन भाटीकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. २०२२ च्या निवडणुकीत ते केवळ ७७ मतांनी रवी नाईक यांच्याकडून पराभूत झाले होते. दरम्यान, आम आदमी पार्टीने गीतेश नाईक यांचा आकस्मिक प्रवेश घडवून आणत त्यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपने मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रितेश नाईक यांना उमेदवारी दिली.
रितेश नाईक यांच्या उमेदवारीमुळे रवी नाईक समर्थकांत आनंद व्यक्त होत असला तरी भाजप गोटात नाराजीचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विश्वनाथ दळवी हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते; मात्र भंडारी समाजाकडून आलेल्या दबावामुळे ही उमेदवारी रितेश नाईक यांना देण्यात आली, अशी माहिती मिळते.
मगोची निर्णायक भूमिका
फोंडा मतदारसंघ हा मगो पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. विशेषतः वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. २०२२ साली डॉ. केतन भाटीकर हे मगोचे उमेदवार होते आणि त्यांनी रवी नाईक यांना जोरदार टक्कर दिली होती. यावेळी ढवळीकर सरकारात मंत्री असल्यामुळे ही जागा भाजपसाठी राखून ठेवावी लागली.
मगो पक्षाने प्रारंभीपासूनच रितेश नाईक यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी अट्टाहास धरला होता. त्यामुळे आता रितेश नाईक यांच्या विजयाची जबाबदारी मगो पक्षावरच राहणार आहे. भाजप–मगो युतीमुळे रितेश नाईक यांना फायदा होऊ शकतो; मात्र सरकारविरोधातील वातावरण आणि राज्यभरातील विविध कारणांमुळे सुरू असलेली सरकारची बदनामी याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Related Posts

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : मोरजी येथील तेंबवाडा येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका वकिलावरील हल्ला नसून कायद्याच्या राज्यावर आणि न्यायव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला आहे,…

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या १५२ प्रश्नपत्रिका फुटींच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत, भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप गोवा…

    You Missed

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला