अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापती श्री. सुहास फळदेसाई

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज ही राज्यातील ९६ कुळी मराठा समाज बांधवांची शिखर संस्था आहे. या समाजाचे नेतृत्व हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. सुहास फळदेसाई करीत आहेत. त्यांची धडाडी, चिकाटी आणि परिश्रम पाहिल्यानंतर या शिखर संस्थेचे प्रमुख म्हणून ते गोव्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापतीच ठरले आहेत, असे कौतुकाने म्हणावे लागेल.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाज संघटीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केले आहे. बाळ्ळी देवस्थानचे माजी सचिव हे पद सांभाळताना, त्यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे माजी सचिव म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. मराठा संकुल प्रकल्प पूर्ण करणे हा त्यांचा प्रमुख ध्यास आहे आणि या ध्यासपूर्तीसाठी ते झपाटल्यागत आपल्या सहकाऱ्यांसह काम करत आहेत.
शालांत शिक्षणानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला. सध्या ते एक जबाबदार सरकारी नगर अभियंता म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. समाजासाठी त्यांनी अनेक दूरदृष्टीच्या योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये समाजबांधवांची सभासद नोंदणी, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन, महिलांचे सक्षमीकरण, तसेच विद्यार्थी आणि तरुणांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे.
ते एक कुशल प्रशासकच नाही, तर एक आकर्षक व्यक्तिमत्त्व देखील आहेत. त्यांचा सौम्य व शांत स्वभाव कोणालाही आपलेसे करून घेतो. समाजाच्या विविध विचारधारांना स्वीकारून सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची क्षमता हेच त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या कामात त्यांच्या प्रेमळ पत्नीचा आणि दोन गोड मुलांचा भक्कम आधार लाभला आहे. त्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने समाजाच्या प्रगतीसाठी वेळ देऊ शकतात.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि एकतेसाठी अहोरात्र झटणारे श्री. सुहास फळदेसाई यांचे कार्य समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज निश्चितच एक नवी दिशा आणि उंची गाठेल यांत काहीच शंका नाही.
एक हीतचिंतक

  • Related Posts

    मगोच्या राजवटीत नक्की कोणाची हानी ?

    ओपिनियन पोल हा उच्चवर्णीयांचे हक्क आणि संसाधनांवर असलेल्या त्यांच्या मालकीबाबत ‘स्टेटस क्वो’ कायम करण्यासाठीचा लढा होता. बांदोडकरांचे बहुजनकेंद्री राजकारण त्यासाठी अडथळा ठरत होते त्यामुळे त्याची घोडदौड रोखण्याचे सगळे प्रयत्न विरोधकांनी…

    उघडले आमठाणेचे दार…

    बार्देशच्या नळांना पाण्याचा मार्ग मोकळा डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी) तिलारीच्या साटेली – भेडशी येथील कालव्याला भगदाड पडल्यानंतर गेले सात दिवस बार्देश तालुक्यात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमठाणे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सामाजिक कार्यकर्त्यांची सितेची परीक्षा

    सामाजिक कार्यकर्त्यांची सितेची परीक्षा

    टीसीपीच्या नाकात जनहीत याचिकांचे वेसण

    टीसीपीच्या नाकात जनहीत याचिकांचे वेसण

    14/02/2025 e-paper

    14/02/2025 e-paper

    13/02/2025 e-paper

    13/02/2025 e-paper

    कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणांचे काय ?

    कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणांचे काय ?

    आमदार जीत आरोलकरांचे अभिनंदन!

    आमदार जीत आरोलकरांचे अभिनंदन!
    error: Content is protected !!