अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापती श्री. सुहास फळदेसाई

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज ही राज्यातील ९६ कुळी मराठा समाज बांधवांची शिखर संस्था आहे. या समाजाचे नेतृत्व हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. सुहास फळदेसाई करीत आहेत. त्यांची धडाडी, चिकाटी आणि परिश्रम पाहिल्यानंतर या शिखर संस्थेचे प्रमुख म्हणून ते गोव्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापतीच ठरले आहेत, असे कौतुकाने म्हणावे लागेल.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाज संघटीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केले आहे. बाळ्ळी देवस्थानचे माजी सचिव हे पद सांभाळताना, त्यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे माजी सचिव म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. मराठा संकुल प्रकल्प पूर्ण करणे हा त्यांचा प्रमुख ध्यास आहे आणि या ध्यासपूर्तीसाठी ते झपाटल्यागत आपल्या सहकाऱ्यांसह काम करत आहेत.
शालांत शिक्षणानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला. सध्या ते एक जबाबदार सरकारी नगर अभियंता म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. समाजासाठी त्यांनी अनेक दूरदृष्टीच्या योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये समाजबांधवांची सभासद नोंदणी, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन, महिलांचे सक्षमीकरण, तसेच विद्यार्थी आणि तरुणांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे.
ते एक कुशल प्रशासकच नाही, तर एक आकर्षक व्यक्तिमत्त्व देखील आहेत. त्यांचा सौम्य व शांत स्वभाव कोणालाही आपलेसे करून घेतो. समाजाच्या विविध विचारधारांना स्वीकारून सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची क्षमता हेच त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या कामात त्यांच्या प्रेमळ पत्नीचा आणि दोन गोड मुलांचा भक्कम आधार लाभला आहे. त्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने समाजाच्या प्रगतीसाठी वेळ देऊ शकतात.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि एकतेसाठी अहोरात्र झटणारे श्री. सुहास फळदेसाई यांचे कार्य समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज निश्चितच एक नवी दिशा आणि उंची गाठेल यांत काहीच शंका नाही.
एक हीतचिंतक

  • Related Posts

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    “महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा.” जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र…

    गोव्याला प्रसिद्धी नव्हे,उत्तरदायी प्रशासन हवे! जॉन्सन डिसिल्वा

    सरकारवर टीका करणे म्हणजे गोव्यावर टीका करणे नव्हे. सरकारला प्रश्न विचारणारा नागरिक हा राज्याचा शत्रू नसतो. उलट, प्रश्न विचारणारे नागरिकच लोकशाही जिवंत ठेवतात. गोव्याला प्रसिद्धीची नव्हे, तर चांगल्या प्रशासनाची आणि…

    You Missed

    26/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 13 views
    26/08/2026 e-paper

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 20 views
    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 24 views
    आरोप गंभीर; सत्य काय ?

    25/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 25, 2026
    • 23 views
    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 25, 2026
    • 19 views
    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 25, 2026
    • 21 views
    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?