मानवी तस्करी विरोधात कार्यशाळा संपन्न


महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा सहभाग, ‘मुक्ती चळवळ’ची स्थापनापर्वरी, दि. १२- दिनांक ९ आणि १० मे हे दोन दिवस पर्वरी येथील दास्या केंद्राच्या सभागृहात गोवा व महाराष्ट्रातील मानवी तस्करी विरोधी कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी गोव्यासह महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन अर्ज (अन्याय रहित जिंदगी) या संस्थेने केले होते.


गोव्यात देहविक्रयातून सुटका झालेल्या मुलींपैकी सुमारे ३०% महिला या महाराष्ट्रातील असल्याचे आढळून आल्याने, गेल्या दीड वर्षांपासून अर्ज संस्थेने या संदर्भात काम हाती घेतले होते. या कामाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतून महिला गोव्यात आणल्या गेल्याचे आढळले, त्या जिल्ह्यांत अर्जने कार्यशाळा घेतल्या. गेल्या दीड वर्षांत अशा एकूण बारा कार्यशाळा घेण्यात आल्या.


या कार्यशाळांचा उद्देश संबंधित जिल्ह्यांतील सरकारी यंत्रणा आणि संवेदनशील नागरिक यांना जागृत करून तिथून होणारी तस्करी थांबवणे हा होता. दुसरा उद्देश म्हणजे गोव्यात सुटका झालेल्या मुलींना आपापल्या जिल्ह्यात परत गेल्यानंतर आवश्यक त्या सेवा मिळाव्यात, जेणेकरून त्यांची पुन्हा तस्करी होणार नाही.


या कार्यशाळांच्या वेळी सहभागी नागरिकांकडून मानवी तस्करी रोखण्याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अनैतिक मानवी तस्करी विरोधी कायदा, प्रतिबंधक उपाय, सुटकांची प्रक्रिया, पुनर्वसन आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर व भंडारा या नऊ जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी होते.


कार्यशाळेच्या अखेरीस सहभागी प्रतिनिधींनी मानवी तस्करी विरोधात संघटित व सातत्यपूर्ण कामाची गरज अधोरेखित करत ‘मुक्ती चळवळ’ सुरू करण्याचे ठरवले. ही चळवळ संवेदनशील गटांसोबत जाणीवजागृतीचे काम करेल, समाजातील पुरुषांची महिलेला विकत घेण्याची प्रवृत्ती कमी करण्याचे प्रयत्न करेल, तसेच प्रसारमाध्यमांतून देहविक्रीबाबतच्या अप्रत्यक्ष जाहीरातींकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून यावर कारवाईसाठी पाठपुरावा करेल. मुक्ती चळवळीची निमंत्रक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार जुईली पांगम यांची निवड करण्यात आली.


ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अर्जचे संचालक अरुण पांडे, उपसंचालक ज्युलियाना लोहार, प्रकल्प अधिकारी नेहा चारी, सोशल वर्कर मंजुळा शिंत्रे आदींनी मेहनत घेतली. कार्यशाळेची सांगता गोवा राज्य बालअधिकार आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure