आता झेडपी आणि आमदारही बनवू!

गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी गरजले
गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी)

आमच्या समाजातील एक व्यक्ती गोव्यात सरपंच बनली आहे. आता यापुढे जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदारही आमच्या समाजातील व्यक्ती बनवण्याइतकी ताकद गोव्यात आहे, अशी गर्जना कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी यांनी केली.
सांकवाळ याठिकाणी कन्नड राज्योत्सव कार्यक्रमानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता सिद्धण्णा मेटी यांनी आक्रमकपणे यावर भाष्य केले आणि कन्नडविरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी थेट रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीला लक्ष्य करत वेगवेगळी सनसनाटी विधाने केली. “कन्नड समाजाचा सरपंच झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन करायला हवे. काही मतदारसंघात आमचे पाच हजार मतदार आहेत, तर काही ठिकाणी दहा ते पंधरा हजार इतके मतदार आहेत. अनेक मतदारसंघात आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री बनण्यासाठीही आमच्या समाजाचा मोठा वाटा आहे,” असे ते म्हणाले.
कष्ट करून खातो, चोरी करत नाही…
“आमचे कपडे बघा, आमचेही राहणीमान गोंयकारांसारखेच आहे. आम्हाला ‘घाटी-घाटी’ म्हणून हिणवणे बंद करा,” असे आवाहन मेटी यांनी केले. “तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला विधानसभेत पोहोचवण्यासाठी तुमच्या सोबत राहू,” असेही त्यांनी सांगितले. “आम्ही कष्ट करून खातो, चोरी करून जगत नाही. जिथे जिथे मोठ्या वस्ती आहेत, तिथे गरीब माणसे हवी लागतात. या वस्ती स्वच्छ ठेवायच्या असतील तर कष्टकरी समाजाची गरज लागते. बारीकसारीक काम, धंदे करणाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्यांनी मोठ्या लोकांना टार्गेट करावे. झुवारीनगरच्या झोपडपट्टीवर बोलणाऱ्यांनी याठिकाणी लाखो चौ. मीटर जमीन विकत घेणाऱ्यांवर बोलावे,” असे आवाहन करत मेटी यांनी अप्रत्यक्षपणे आरजीपीवर शरसंधान साधले.
आमची बदनामी नको
सिद्धण्णा मेटी यांनी पुढे सांगितले, “रात्री ग्लाससोबत बसून व्हिडिओ काढून आम्हाला बदनाम करणे थांबवा. आमच्याकडेही तुमची कुंडली आहे. तरीदेखील आम्ही गप्प आहोत. तुमचे नाव घेण्यास आम्हाला शरम वाटते,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आरजीपीच्या नेत्यांना थेट आव्हान दिले.
“आम्ही भारताची संस्कृती जतन करत आहोत. गोव्यात आम्हाला ५३ वर्षे झाली आहेत, त्यापेक्षा अधिक काळ कन्नड लोक येथे वास्तव्यास आहेत. आम्ही संविधान मानतो. आम्हाला ‘घाटी-घाटी’ म्हणून हिणवणारे पक्ष संविधान मानत नाहीत का?” असा सवाल मेटी यांनी उपस्थित केला.
उत्तर भारतीयांचे काय?
“उत्तर भारतीयांनी गोव्यात येऊन लाखो चौ. मीटर जमीन विकत घेतली आहे. गोव्याच्या विनाशाला ते कारणीभूत आहेत. त्यांच्या विरोधात आरजी पक्षाने आवाज उठवावा. जुवारी येथे लाखो चौ. मीटर जमीन घेतली आहे; त्यांच्या विरोधात आवाज उठवा. बस्त्यांमध्ये राहणाऱ्या कन्नड समाजाच्या लोकांना त्रास देऊ नका. आम्ही एकमेकांना भावाप्रमाणे मानतो,” असे मेटी यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    विरोधक आणि सत्ताधारी सज्ज गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत आहे. २७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १४ दिवसांचे कामकाज होणार आहे.…

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबागवासीयांचे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेले नियोजित बंधाराविरोधातील आंदोलन सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. आंदोलन तीव्र करण्याच्या इराद्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी…

    You Missed

    05/03/2026 e-paper

    05/03/2026 e-paper

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    04/03/2026 e-paper

    04/03/2026 e-paper

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार