भाजपला यश पण सबूरीचा सल्ला

विरोधकांना एकत्र येण्याचा स्पष्ट कौल

गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी)

राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने भाजप आघाडीलाच पसंती दिली आहे. हे करत असतानाच मतदारांनी दिलेला कौल अत्यंत सूचक ठरला असून भाजपने वेळीच चुकांची सुधारणा केली नाही, तर विधानसभेला धडगत नाही, असेही या निकालांतून स्पष्ट झाले आहे.
गत २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ३३ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला पाच वर्षांनंतर २९ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप युतीतील घटक मगो पक्षाने आपले तीनही उमेदवार निवडून आणल्याने ५० पैकी ३२ जागांवर सरकारने यश मिळवले आहे.
उत्तर गोव्यात भाजपने चांगले यश मिळवले असले तरी दक्षिण गोव्यात मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस पक्षाने यावेळी चांगली कामगिरी करत सासष्टी तालुक्यातील आपले प्राबल्य अबाधित ठेवले आहे. सासष्टीच्या सर्व ८ जागांवर काँग्रेसने यश मिळवले आहे. २०२० च्या जिल्हा पंचायतीत केवळ ४ जागांवर विजयी ठरलेल्या काँग्रेसने ९ ठिकाणी यश मिळवून आपली लाज वाचवली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सासष्टीतील काँग्रेसची प्रतिष्ठा जपण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या आमदारांनी आपापले मतदारसंघ सांभाळले. आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी सांतआंद्रेचा आपला गड राखून दोन्ही जागा मिळवण्यात यश मिळवले. गोवा फॉरवर्ड आणि आप पक्षाला फक्त एकाच ठिकाणी यश मिळाले आहे, तर चार ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय प्राप्त केला.
आपचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांना बाणावलीत तर वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांना वेळ्ळीत धक्का देण्यात काँग्रेसने यश मिळवले आहे. एकंदरीत विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात, रोहन खंवटे, मायकल लोबो, मॉविन गुदीन्हो यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपापले गड राखून आपली प्रतिष्ठा सांभाळली आहे.

गोव्यात ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. त्यांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. ईव्हीएमवर दोष ठेवणाऱ्या काँग्रेसला आता बॅलेट पेपरनेही नाकारले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयाची ही नांदी ठरेल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री – गोवा राज्य

भाजपच्या जुलमी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. किमान या कौलाचा विचार करून तरी विरोधकांनी एकसंघ होण्याची गरज आहे. जनतेने विरोधकांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत आणि बाहेरील कपटी घटकांना बाजूला सारणे गरजेचे आहे. हा जनतेचा विजय आहे. विरोधकांच्या मतविभागणीमुळे भाजपला फायदा झाला आहे. ही विभागणी दूर केली, तर भाजपचा २०२७ मध्ये सफाया निश्चित आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

  • Related Posts

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    बेकायदा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचे अभय – स्वप्नेश शेर्लेकर गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात उद्योजक कमलाप्रसाद यादव यांनी उभारलेले १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम अजून कायदेशीर मान्यता प्राप्त…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper