धारगळ रविंद्र भवनला चालना हवी

राजन कोरगांवकर यांची मागणी

पेडणे, दि. २१ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यासाठी धारगळ येथे रविंद्र भवनसाठी सरकारने जागा निश्चित केली आहे. कला आणि संस्कृती खात्याच्या ताब्यात ही जागा दिली असतानाही काही लोक विनाकारण जागेचा वाद निर्माण करून हे रविंद्र भवन तालुक्यात अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करत आहेत. धारगळ ही रविंद्र भवनसाठी योग्य जागा आहे आणि या जागेत रविंद्र भवन उभारणीसाठी चालना देण्यात यावी, अशी मागणी मिशन फॉर लोकल, पेडणेचे संस्थापक राजन कोरगांवकर यांनी केली.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी रविंद्र भवन तुये येथे उभारण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. पेडणे तालुक्यासाठी धारगळ येथे जागा निश्चित होऊनही जागेवरून नवा वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. पेडणे मतदारसंघासाठी धारगळ ही जागा योग्य आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक तसेच आयुष इस्पितळ, मोपा विमानतळ आणि अन्य नियोजित प्रकल्पांमुळे रविंद्र भवन येथे शोभणार आहे, असेही राजन कोरगांवकर म्हणाले. तुये येथे नवीन रविंद्र भवन होत असेल तर त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, परंतु धारगळ रविंद्र भवनला हरकत घेणे किंवा अपशकून करणे अयोग्य आहे, असे मत कोरगांवकर यांनी बोलून दाखवले.
पेडणेच्या आमदारांनी पुढाकार घ्यावा
पेडणे मतदारसंघातील धारगळ याठिकाणच्या नियोजित रविंद्र भवनला पर्यायी जागा शोधण्याचे काम आमदार जीत आरोलकर करत असताना पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर हे गप्प का, असा सवाल राजन कोरगांवकर यांनी केला. उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रश्न जीत आरोलकर यांनीच मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला पण तिथेही आमदार दिसले नाहीत. आमदारांनी पेडणे मतदारसंघ सोडला की काय, असा सवालही राजन कोरगांवकर यांनी केला. पेडणेतील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन तसेच मांद्रे मतदारसंघातीलही कलाकारांनी पाठींबा देऊन जागा निश्चित झालेल्या धारगळ याठिकाणीच रविंद्र भवन उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही राजन कोरगांवकर यांनी केले.
नियोजित जागेत आग
तुये येथे जिथे रविंद्र भवनसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे, तिथे काजू तथा अन्य झाडे असल्याने शनिवारी या जागेत कुणीतरी अज्ञातांनी आग लावण्याचा प्रकार घडला. या जागेचे मापन मामलेदार, टीसीपी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मुळात ही आल्वारा जमीन आहे आणि तिथे शेतकरी काजूचे पीक घेत आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी प्रमाणेच आता रविंद्र भवनच्या नावे ही जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय, असा सवाल शेतकरी करत आहेत.

  • Related Posts

    पडत्या फळाची आज्ञा !

    हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.…

    “कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

    रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन! अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!