विरेश पुन्हा मैदानात

आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार

गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

सोमवारी रात्री प्रकृती खालावल्यामुळे खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर आणि तुषार गांवस हे दोघेही मंगळवारी सकाळी पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाले. जोपर्यंत वादग्रस्त कलम ३९(ए) रद्द केले जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिरदोन-पाळेवासियांशी चर्चा केल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा आज निश्चित केली जाईल, अशी माहिती अजय खोलकर यांनी दिली.
सोमवारी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्यावर विराट मोर्चा नेण्यात आला. रात्रभर तिथेच ठिय्या मांडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असता, आझाद मैदानावर विरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्याची वार्ता मिळाल्याने हा मोर्चा पुन्हा आझाद मैदानावर वळविण्यात आला. डॉ. ऑस्कर रिबेलो हे विरेश बोरकर यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल करण्याची विनंती केली. मात्र विरेश बोरकर तयार नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्वांनी समजूत काढल्यानंतर विरेश आणि तुषार या दोघांनाही खाजगी इस्पितळात हलविण्यात आले. सकाळी ११ वाजता ते पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाले.
पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे सुनावणी
आमदार विरेश बोरकर यांच्याबाबतीत पोलिस बळाचा वापर करून त्यांना फरफटत कार्यालयाबाहेर ओढून आणण्याच्या प्रकरणासंबंधी काशिनाथ शेटये यांनी गोवा पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. यात पोलिस निरीक्षक विजय चोडणकर आणि पोलिस अधीक्षक हरिषचंद्र मडकईकर यांना प्रतिवादी केले असून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या १२ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.
सरदेसाई विरुद्ध परब वाकयुद्ध
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. सरदेसाई हे विश्वजीत राणे यांच्या घरावर मोर्चात सहभागी का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी केला. परब यांनी आरोप केला की सरदेसाई यांचे सरकारातील अनेकांकडे घनिष्ठ संबंध आहेत. ३९(ए) कलमाचे मूळ रूप हे १६(ब) असून त्याचे ते जनक आहेत. विधानसभेत या वादग्रस्त विधेयकावेळीही त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नाही. विधानसभेत ते या विषयाला न्याय द्यायला तयार नाहीत आणि विधानसभेबाहेरही आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका परब यांनी केली.
विजय सरदेसाई यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की मनोज परब यांना उत्तर देण्याची पात्रताच नाही. या आंदोलनात लहान मुले, महिलांचा समावेश होता. एखाद्याच्या खाजगी घरावर मोर्चा नेणे हे अयोग्य वाटल्यानेच आणि आंदोलनातील लोकांच्या सुरक्षेचा विषय महत्त्वाचा असल्यामुळेच आपण गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    RTI activist Sudip Narayan Tamankar has urged the Goa Transport Minister to allow manual renewal of Rent-a-Bike permits, which have been stuck since 2024 due to NIC software issues, affecting operators’ livelihoods and tourism.

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    Former GPCC President Amit Patkar has welcomed the Supreme Court’s verdict in favour of PWD workers, calling it a landmark judgment that upholds justice, fairness, and the dignity of government employees.

    You Missed

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 4 views
    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 7 views
    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 8 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 17 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 28 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision