तीन वर्षांत गोशाळेतील २ हजार गायी दगावल्या

गोसंवर्धनावर एकूण ५२ कोटी रूपये खर्च

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)

राज्यातील विविध गोशाळेतील सुमारे २ हजार गायी गेल्या तीन वर्षांत दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने भटक्या गुरांच्या संवर्धनार्थ विविध गोशाळांना मान्यता दिली असून, गेल्या तीन वर्षांत गोसंवर्धनावर सुमारे ५२ कोटी रुपयांचे अनुदान खर्च झाले आहे.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी यासंबंधीचा प्रश्न पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. प्रूडंट मीडियाने यासंबंधीचे वृत्त प्रसारित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. राज्यातील ८ गोशाळांत मिळून ५ हजार ६६८ गायी आहेत. मागील तीन वर्षांत या गोशाळांतील सुमारे २ हजार गायी दगावल्याची माहिती पुढे आली आहे. या गायींच्या मृत्यूची चिकित्सा खात्याने केली असली तरी, त्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मागील तीन वर्षांत गोशाळांतून केवळ एकच गाय बेपत्ता झाल्याची माहितीही खात्याने दिली आहे.

विशेष म्हणजे गोशाळांमध्ये एवढ्या गायी असूनही, अनेक ठिकाणी भटक्या गुरांचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. भटक्या गुरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारने स्थानिक पंचायत तथा पालिकांवर सोपविली आहे. पंचायत, पालिकांनी थेट गोशाळांकडे करार करून भटकी गुरे पकडून ती थेट गोशाळेत पाठवण्याची सोय केली आहे. गोशाळांमुळे भटक्या गुरांना आधार मिळाला हे जरी खरे असले तरी, त्यांचे संवर्धन आणि सांभाळ जोपर्यंत शेतकरी करणार नाही तोपर्यंत सरकारसाठी अनुदानाच्या पोटी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गोशाळेचे नाव एकूण गायी दगावलेल्या गायी अनुदान
गोमंतक गौसेवक महासंघ, मये ४२४५ १४३९ ४०.२५ कोटी
ध्यान फाउंडेशन, गोवा, जांबावली ७०८ ३४८ ६.७८ कोटी
अखिल विश्व जय श्रीराम, केंद्रे ४३५ १०२ ३.२५ कोटी
लीव सीनर्जी, सावईवेरे ११ १७ २३.१५ लाख
वेलफेअर फॉर एनीमल्स, शिवोली ५० ५ ५६.२० लाख
शंकावली तिर्थक्षेत्र, सांकवाळ ७ ० ४.३८ लाख
कामधेनू गौरक्षक संस्था, काणकोण १६० ७ १७.८९ लाख
ऑर्गनायझेशन फॉर पीपल्स अॅण्ड एनिमल्स, फोंडा ५२ ५९ ३३.०३ लाख

  • Related Posts

    रवी नाईक – आगे बढ़ो!

    सध्याच्या परिस्थितीत सर्वच मंत्र्यांनी गप्प राहण्याचा पवित्रा घेतलेला असताना, रवी नाईक यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते. गोव्याचे पात्रांव, म्हणजेच फोंड्याचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक. कधीकाळी गृहमंत्री असताना गुंडगिरीवर…

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मडगावची ६०% न्यायालये अकार्यरत

    मडगावची ६०% न्यायालये अकार्यरत

    सत्तेचं मौन, समाजाचं दुर्लक्ष !

    सत्तेचं मौन, समाजाचं दुर्लक्ष !

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper
    error: Content is protected !!