म्हादईचा सौदा होऊ देणार नाही

आरजीपीची एनआयओसमोर निदर्शने

गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

म्हादई नदीचे अस्तित्व गोव्याच्या अस्तित्वाशी थेट संबंधित आहे. कर्नाटक सरकार या नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करत असून भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष म्हादईच्या विषयावरून राजकारण करत कर्नाटकला मदत करत आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या तीन शास्त्रज्ञांनी म्हादईच्या पाणी वळविण्याच्या परिणामांचा अभ्यास करून जारी केलेला अहवाल ही एक मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप आरजीपीने केला आहे.
आज आरजीपीतर्फे दोना पावला येथील एनआयओच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर, पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, सचिव विश्वेश नाईक तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय पक्षांचे मतांचे राजकारण पाहता म्हादईच्या बाबतीत गोव्याला न्याय मिळू शकणार नाही, अशी टीका आमदार विरेश बोरकर यांनी केली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, गुपचुपपणे शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात आलेला हा अहवाल गोव्याची बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे तसेच गोव्याकडून दावा केला जाणाऱ्या परिणामांना फोल ठरविण्याचा कट आहे.
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा अंदाज
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने केंद्र सरकारची प्रभावळ ती संस्थेवर चालू शकते. त्यामुळे म्हादईच्या अहवालाबाबत केंद्राचे दबावतंत्र असण्याची शक्यता आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतील, याचा पूर्वी सखोल विचार झाला आहे. डॉ. नंदकुमार कामत, राजेंद्र केरकर, रमेश गांवस, निर्मला सावंत यांनी वेळोवेळी हे मुद्दे जनतेसमोर ठेवले आहेत.
एनआयओच्या अहवालाचा आधार घेत कर्नाटकला झुकते माप देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. दरवेळी निवडणुकीच्या काळातच राष्ट्रीय पक्षांना म्हादईची आठवण होते, अशी टीका मनोज परब यांनी केली.

  • Related Posts

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे…

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    27/03/2026 e-paper