समेटाच्या दिशेने आरजीपीचे पहिले पाऊल

मनोज परब यांच्याकडून माणिकराव ठाकरेंची माफी

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागितली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची आघाडी व्हावी, अशी तीव्र इच्छा आरजीपीची होती. ती फसल्याच्या नैराश्यातून माणिकराव ठाकरे यांच्याप्रती चुकीचे शब्द तोंडी आले. आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून मनोज परब यांनी नव्या समेटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागला असला तरी या निकालातून विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदाच भाजप आघाडीला होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकांनी विरोधकांनाही विश्वासाचा कौल दिला आहे आणि विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे, असा स्पष्ट संदेश या निकालातून प्रकट झाला आहे. सोमवारी जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागणारा संदेश टाकल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


आरजीपीने पुन्हा एकदा नव्याने महाविरोधी आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चेसाठी पहिले पाऊल टाकले आहे. या निवडणुकीत आरजीपीला दोन जागा मिळाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस आणि आरजीपी एकत्र आल्यास त्याचा जबर परिणाम भाजप आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच आघाडीसंबंधीची चर्चा सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.
महाविरोधी आघाडी व्हायलाच हवी – युरी आलेमाव
जिल्हा पंचायतीसाठी महाविरोधी आघाडी होणे शक्य होते, परंतु पक्षांतर्गत काही घटकांच्या नाकर्तेपणामुळे ती फसली. आपण अजूनही महाविरोधी आघाडीसाठी आग्रही आहोत. भाजपची भ्रष्ट आणि गोवाविरोधी राजवट उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी तडजोड करावीच लागेल. गोव्याचे हित आणि भविष्य लक्षात घेऊन ही आघाडी होण्याची गरज आहे. काँग्रेस श्रेष्ठीं समोर आपण ही भूमिका मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

  • Related Posts

    सांगेतील वादावर पडदा

    कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचा दामू नाईक यांचा दावा गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक…

    Private Bus Operators Seek CM’s Directive to Halt Further KTCL EV Bus Induction

    Panaji, August 2: RTI activist Sudip Narayan Tamankar has written to Chief Minister Dr. Pramod Sawant requesting an official directive restraining the Kadamba Transport Corporation Ltd. (KTCL) from hiring or…

    You Missed

    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper