समेटाच्या दिशेने आरजीपीचे पहिले पाऊल

मनोज परब यांच्याकडून माणिकराव ठाकरेंची माफी

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागितली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची आघाडी व्हावी, अशी तीव्र इच्छा आरजीपीची होती. ती फसल्याच्या नैराश्यातून माणिकराव ठाकरे यांच्याप्रती चुकीचे शब्द तोंडी आले. आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून मनोज परब यांनी नव्या समेटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागला असला तरी या निकालातून विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदाच भाजप आघाडीला होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकांनी विरोधकांनाही विश्वासाचा कौल दिला आहे आणि विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे, असा स्पष्ट संदेश या निकालातून प्रकट झाला आहे. सोमवारी जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागणारा संदेश टाकल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


आरजीपीने पुन्हा एकदा नव्याने महाविरोधी आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चेसाठी पहिले पाऊल टाकले आहे. या निवडणुकीत आरजीपीला दोन जागा मिळाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस आणि आरजीपी एकत्र आल्यास त्याचा जबर परिणाम भाजप आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच आघाडीसंबंधीची चर्चा सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.
महाविरोधी आघाडी व्हायलाच हवी – युरी आलेमाव
जिल्हा पंचायतीसाठी महाविरोधी आघाडी होणे शक्य होते, परंतु पक्षांतर्गत काही घटकांच्या नाकर्तेपणामुळे ती फसली. आपण अजूनही महाविरोधी आघाडीसाठी आग्रही आहोत. भाजपची भ्रष्ट आणि गोवाविरोधी राजवट उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी तडजोड करावीच लागेल. गोव्याचे हित आणि भविष्य लक्षात घेऊन ही आघाडी होण्याची गरज आहे. काँग्रेस श्रेष्ठीं समोर आपण ही भूमिका मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

  • Related Posts

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन सादर गांवकारी,दि.२ (प्रतिनिधी) गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे बुधवारी राज्यपाल पी.एस.अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर निवेदन सादर करत तातडीने घटनात्मक हस्तक्षेप…

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) राज्यातील वेगवेगळ्या सीमांवर वाहतूक खात्यातर्फे उभारण्यात आलेल्या आरटीओ चेकपोस्टवर पोस्टिंग मिळवण्यासाठी दर सहा महिन्यांनी लाखो रुपयांच्या बोली लावल्या जातात. सर्वाधिक…

    You Missed

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    02/07/2026 e-paper

    02/07/2026 e-paper

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    01/07/2026 e-paper

    01/07/2026 e-paper

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर