‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?

अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र

म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या वादात या ४६ घरांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

आत्माराम गडेकर यांची तक्रार
आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आसगांव कोमुनिदादच्या जागेत एकूण ४६ घरे उभी राहीली आहेत. या घरांच्या वसाहतीला लक्ष्मीनगर असे नाव देण्यात आले आहे. ही घरे आसगांव पंचायत क्षेत्रात येत असताना म्हापसा नगरपालिकेकडून या घरांची घरपट्टी वसुल करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हापला मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हापसा नगरपालिकेच्या लोकांनी या घरपट्टीच्या आधारे याठिकाणी बेकायदा मतपेढी तयार केल्याची टीका गडेकर यांनी केली आहे.
आसगांव पंचायतीला पत्र
या लक्ष्मीनगर वसाहतीसंबंधीचे पत्र आत्माराम गडेकर यांनी आसगांव पंचायत तथा आसगांव कोमुनिदादला केले आहे. या पत्रावरून आसगांव पंचायतीने म्हापसा नगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागीतले आहे. म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेटकर यांनी आसगांव पंचायतीला या जागेच्या अधिकारक्षेत्राबाबत सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागतील्याचे पत्र पंचायतीला पाठवले आहे. म्हापसा नगरपालिकेला सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागण्याची वेळ येणे ह्यावरूनच ही घरे म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, याबाबत पालिकेलाच खात्री नाही, हे उघड झाल्याचे गडेकर यांनी म्हटले आहे.
दक्षता खात्याकडेही तक्रार
तक्रारदार आत्माराम गडेकर यांनी बेकायदा घरांना घरक्रमांक दिल्याच्या हा विषय दक्षता खात्याकडे पोहचवला आहे. आसगांव कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक १४५ मधील उपविभाग पाडून हे क्रमांक दिले गेले आहेत. २००१ मध्ये ३३, २००२ मध्ये १, २०१५ मध्ये १ आणि २०२४ मध्ये ११ घरांना घरक्रमांक दिल्याची माहिती आणि त्यासोबत घरपट्टी पावत्याही त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आहेत.
म्हापसेकरांनो जागे व्हा- गडेकर
म्हापसा शहरात अशाच तऱ्हेने ठिकठिकाणी बेकायदा घरे, झोपडपट्टी उभारून मतपेढी तयार केली आहे. या मतपेढीच्या जोरावरच राजकारण केले जाते. या मतपेढीमुळेच आज म्हापसेकरांचे महत्व कमी होत चालले आहे. या मतपेढीच्या जोरावर म्हापसेकरांना लाचार बनवण्याचे प्रकार सुरू असून म्हापसा शहर वाचवायचे असेल आणि आपल्या ताब्यात ठेवायचे असेल तर ही बेकायदा मतपेढी तथा बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे,असे मत आत्माराम गडेकर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे खरमरीत पत्र गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेने मंजूर केलेले नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) हे पूर्णपणे बेकायदेशीर असून मनमानी स्वरूपाचे आहे. या कायद्याअंतर्गत…

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    You Missed

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper