‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?

अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र

म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या वादात या ४६ घरांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

आत्माराम गडेकर यांची तक्रार
आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आसगांव कोमुनिदादच्या जागेत एकूण ४६ घरे उभी राहीली आहेत. या घरांच्या वसाहतीला लक्ष्मीनगर असे नाव देण्यात आले आहे. ही घरे आसगांव पंचायत क्षेत्रात येत असताना म्हापसा नगरपालिकेकडून या घरांची घरपट्टी वसुल करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हापला मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हापसा नगरपालिकेच्या लोकांनी या घरपट्टीच्या आधारे याठिकाणी बेकायदा मतपेढी तयार केल्याची टीका गडेकर यांनी केली आहे.
आसगांव पंचायतीला पत्र
या लक्ष्मीनगर वसाहतीसंबंधीचे पत्र आत्माराम गडेकर यांनी आसगांव पंचायत तथा आसगांव कोमुनिदादला केले आहे. या पत्रावरून आसगांव पंचायतीने म्हापसा नगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागीतले आहे. म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेटकर यांनी आसगांव पंचायतीला या जागेच्या अधिकारक्षेत्राबाबत सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागतील्याचे पत्र पंचायतीला पाठवले आहे. म्हापसा नगरपालिकेला सर्वेक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागण्याची वेळ येणे ह्यावरूनच ही घरे म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, याबाबत पालिकेलाच खात्री नाही, हे उघड झाल्याचे गडेकर यांनी म्हटले आहे.
दक्षता खात्याकडेही तक्रार
तक्रारदार आत्माराम गडेकर यांनी बेकायदा घरांना घरक्रमांक दिल्याच्या हा विषय दक्षता खात्याकडे पोहचवला आहे. आसगांव कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक १४५ मधील उपविभाग पाडून हे क्रमांक दिले गेले आहेत. २००१ मध्ये ३३, २००२ मध्ये १, २०१५ मध्ये १ आणि २०२४ मध्ये ११ घरांना घरक्रमांक दिल्याची माहिती आणि त्यासोबत घरपट्टी पावत्याही त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आहेत.
म्हापसेकरांनो जागे व्हा- गडेकर
म्हापसा शहरात अशाच तऱ्हेने ठिकठिकाणी बेकायदा घरे, झोपडपट्टी उभारून मतपेढी तयार केली आहे. या मतपेढीच्या जोरावरच राजकारण केले जाते. या मतपेढीमुळेच आज म्हापसेकरांचे महत्व कमी होत चालले आहे. या मतपेढीच्या जोरावर म्हापसेकरांना लाचार बनवण्याचे प्रकार सुरू असून म्हापसा शहर वाचवायचे असेल आणि आपल्या ताब्यात ठेवायचे असेल तर ही बेकायदा मतपेढी तथा बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे,असे मत आत्माराम गडेकर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    23/06/2026 e-paper

    23/06/2026 e-paper

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper