आंदोलकांसह मुख्यमंत्री जिंकले !

आता प्रत्येकाने याचा विचार करून आपले गाव वाचवण्यासाठी एकजुटीने आणि चिकाटीने लढण्याची तयारी ठेवावी, हीच या आंदोलनांची खरी फलनिष्पत्ती म्हणावी लागेल.

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर मिराबागवासीयांच्या चिकाटीची दखल घेत ४९ व्या दिवशी प्रस्तावित बंधारा प्रकल्प रद्द करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. युनिटी मॉल, त्यानंतर सांतआंद्रेतील ३९(ए) प्रकरण, साखळीतील ३९(ए) प्रकरण आणि आता मिराबाग प्रकरण – या सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या भावनांचा आदर राखत निर्णय रद्द केले.
सामान्यतः आंदोलनानंतर प्रकल्प किंवा निर्णय रद्द करणे ही सरकारसाठी नामुष्की ठरते. मात्र येथे आंदोलकांसह मुख्यमंत्र्यांप्रती लोकांचा आदर वाढतो आहे. सरकारची नामुष्की ही नेत्यासाठी कौतुकाची बाब कशी ठरते, याचे कोडे विरोधकांना अजूनही सुटलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या तऱ्हेने हे निर्णय रद्द केले, त्यातून संबंधित खात्यांचे मंत्री तोंडघशी पडले आहेत.
युनिटी मॉलसाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जोरदार समर्थन केले होते. ३९(ए) प्रकरणात नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांची भूमिका ठाम होती. तरीही मुख्यमंत्र्यांनी आंदोलनानंतर निर्णय रद्द करून दोघांनाही उघडे पाडले. मिराबाग बंधारा प्रकरणात जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची भूमिका संशयास्पद वाटत होती. आता हा निर्णय रद्द करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचीही सुटका करून घेतली.
अलिकडच्या घटनांनी सिद्ध केले आहे की आंदोलनाचे शस्त्र अंगिकारल्यास यश मिळतेच. मात्र त्यासाठी भक्कम तयारी, विषयाचा अभ्यास आणि चिकाटी आवश्यक आहे. या आंदोलनांच्या निमित्ताने जनतेलाही एक धडा मिळाला आहे – आपल्या हक्कांसाठी जिद्दीने बाहेर पडाल तर यश निश्चित मिळते.
राज्यभरातील गावागावातील लोकांनी हा बोध घेणे गरजेचे आहे. आपल्या गावांचे रक्षण करायचे असेल तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. मुख्यमंत्री लोकांच्या प्रामाणिक इच्छेला सकारात्मकतेने प्रतिसाद देतात. जिथे लोकांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची क्षमता नाही, तिथले प्रश्न सुटणे कठीण आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आपले गाव वाचवण्यासाठी एकजुटीने आणि चिकाटीने लढण्याची तयारी ठेवावी – हीच या आंदोलनांची खरी फलनिष्पत्ती ठरते.

  • Related Posts

    नाकर्तेपणा, असंवेदनशीलतेचे शतक !

    आपल्या राज्यातील नागरिकांना न्यायासाठी हजारो किलोमीटर दूर दिल्लीपर्यंत जावे लागते, यापेक्षा मोठे प्रशासनाचे अपयश कोणते? कारापूरच्या आंदोलनाने आज शंभर दिवस पूर्ण केले. ही केवळ आंदोलनाची शंभरी नाही, तर सरकारच्या नाकर्तेपणाची,…

    महाराष्ट्र जागला, गोवा कधी ?

    आता गोवा सरकारनेही त्याच धर्तीवर मोपा विमानतळ परिसरातील गेल्या दहा वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची चौकशी जाहीर करावी. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर उत्तर गोव्याच्या सीमावर्ती भागातील जमिनींना सोन्याचा भाव आला.…

    You Missed

    Bavaria Motors’ Appeal Dismissed; Goa Govt Upholds 90-Day Trade Certificate Suspension

    Bavaria Motors’ Appeal Dismissed; Goa Govt Upholds 90-Day Trade Certificate Suspension

    13/07/2026 e-paper

    13/07/2026 e-paper

    नाकर्तेपणा, असंवेदनशीलतेचे शतक !

    नाकर्तेपणा, असंवेदनशीलतेचे शतक !

    कारापूरवासियांचा दिल्लीत हुंकार

    कारापूरवासियांचा दिल्लीत हुंकार

    Congress Demands Supreme Court-Monitored Judicial Probe into Alleged Ram Mandir Donation Scam

    Congress Demands Supreme Court-Monitored Judicial Probe into Alleged Ram Mandir Donation Scam

    Margao Fire Exposes Failure to Deliver on Fire Safety Promises: Prabhav Naik

    Margao Fire Exposes Failure to Deliver on Fire Safety Promises: Prabhav Naik