गोवा फलोत्पादन महामंडळातील पदोन्नतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह

काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांचा आरोप

गांवकारी,दि.३(प्रतिनिधी)

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ, टोंक-कारंझाळे येथे तीन पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक मार्केटिंग अधिकाऱ्याला पदोन्नती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आरोप केला की या पदोन्नती पारदर्शक व नियमित प्रक्रिया न राबविता, मुलाखती न घेता तसेच पात्र वरिष्ठ कर्मचाऱ्यांना समान संधी न देता केल्या जात आहेत.
अमरनाथ पणजीकर म्हणाले, “जवळपास दोन दशके प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नंतर रुजू झालेल्या निवडक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रयत्न अत्यंत धक्कादायक आहे. अशा मनमानी निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होते आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांवर घाला घातला जातो.”
महामंडळातील सुमारे २३० कर्मचारी अनेक वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असून, त्यांपैकी अनेक २००६ पासून सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांचे नियमितीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्या अद्यापही प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.
“भाजप सरकार पारदर्शकता आणि सुशासनाच्या गप्पा मारते. मात्र, जर प्रस्थापित नियमांचे पालन न करता आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय करून पदोन्नती दिल्या जात असतील, तर ते सरकारच्या दुटप्पी भूमिकेचे द्योतक आहे. गुणवत्ता आणि ज्येष्ठतेचा बळी देऊन मोजक्याच लोकांना लाभ देण्याचे काम खपवून घेतले जाणार नाही,” असे पणजीकर यांनी स्पष्ट केले.
त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि गोवा सरकार यांना प्रस्तावित पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून, लागू सेवा नियमांनुसार ज्येष्ठता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांवर आधारित न्याय्य प्रक्रिया राबवण्याची मागणी केली. तसेच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय तातडीने घेऊन कर्मचाऱ्यांचा असंतोष दूर करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
“काँग्रेस पक्ष अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य लढ्याच्या ठामपणे पाठीशी उभा आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला पक्षपात किंवा मनमानीमुळे त्याचा हक्क नाकारला जाऊ नये. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी आणि कर्मचाऱ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा,” असे अमरनाथ पणजीकर यांनी ठामपणे सांगितले.

  • Related Posts

    “आज नाही तर कधीच नाही”

    धनगर समाजाच्या एसटी मागणीसाठी निर्धार सत्तरी, दि. ११ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा, या मागणीसाठी गोवा धनगर समाज सेवा संघ, सत्तरी यांच्या वतीने सुरू असलेल्या कोपरा बैठकांच्या मालिकेतील…

    झोनिंग आणि वापराच्या बदलाशी संबंधित सर्व भ्रष्ट कायदे रद्द करा.

    मागील लेखात आपण भू-वापराशी संबंधित आरपी २१ (RP 21) च्या विविध तरतुदींवर आणि गावांच्या विकासासंबंधीच्या काही धोरणांवर चर्चा केली आहे.नगर आणि ग्राम नियोजन कायदा १९७४ (Town and Country Planning Act…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure