गोलमाल है भाई, सब गोलमाल!

उपनिबंधकांच्या तक्रारीवर वाळपई पोलिसांची चुप्पी

गांवकारी, दि.२० (प्रतिनिधी)

धारगळ-पेडणे येथील एका जमिनीच्या बनावट वीलप्रकरणी सत्तरी- वाळपईच्या उपनिबंधक कार्यालयाने खातरजमा केल्यानंतर तात्काळ वाळपई पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिस निरीक्षकांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.
धारगळ दाडाचीवाडी येथील जमिनीचे वाळपई- सत्तरी येथील उपनिबंधक कार्यालयात वील केल्याचे दाखवण्यात आले आहे. या बनावट वीलच्या आधारे जमिनीचा व्यवहार करण्यात आला असून, या प्रकरणात प्रशासनातील काही अधिकारी गुपचूप सहकार्य करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खुद्द उपनिबंधक कार्यालयाने तक्रार दाखल करूनही वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास विलंब का केला, यावर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
वाळपई पोलिसांच्या भूमिकेची चौकशी आवश्यक
धारगळ- दाडाचीवाडीतील बनावट वीलप्रकरणी मायणे-पिळर्ण येथील गणपत गोवेकर यांनी ६ ऑक्टोबर २०२२ रोजी वाळपई उपनिबंधकांना पत्र पाठवून माहिती मागितली होती. त्यानंतर तत्कालीन उपनिबंधक गौरीष बुगडे यांनी वीलची खातरजमा करून ते बनावट असल्याचे स्पष्ट केले.
याच संदर्भात राज्य निबंधकांनी वाळपई उपनिबंधकांना तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ११ नोव्हेंबर २०२२ रोजी वाळपई पोलिस ठाण्याला पत्र पाठवून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीवर वाळपई पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
नवी तक्रार दाखल; न्यायाची अपेक्षा
या प्रकरणात तक्रारदार गजानन कोरगांवकर यांनी वाळपई पोलिस ठाण्यात नव्याने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी बनावट वीलच्या चौकशीसह संशयित सुभाष कानुळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
पेडणे मामलेदार रणजित साळगांवकर यांनी पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्या निवाड्यानंतरही हे म्यूटेशन रद्द करण्यास विलंब का केला, याबद्दलही शंका व्यक्त होत आहे. एवढे करून संशयितांनी पणजी अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निवाड्याला स्थगिती मिळवली आहे, त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाची शक्यता वर्तवली जात आहे.
अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जून रोजी पुढील सुनावणी होणार असून, या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका