गोविंदबाब, आता खरं बोला!

हे डाग तसेच ठेवून पुढे गेले, तर त्यांच्या विरोधातील आरोपांचीच पुष्टी होईल. पण त्यांनी खरे बोलण्याचे धाडस केले, तर गोव्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळेल, याबाबत कोणताही संशय नाही.

राज्याचे कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी स्वतःहून राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेतला. मंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण न करता पदावरून हटवले गेलेले ते दुसरे मंत्री ठरले आहेत. गावडे यांनी थेट कलाकारांशी पंगा घेतल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे. त्यांना मंत्रीपदावरून का वगळले गेले, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर उघडपणे टीका केली आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार असल्याचे सूचित केले. त्यामुळे ही कारवाई झाली का, की कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे सरकारची बदनामी झाली म्हणून त्यांना हटवले गेले, हे अद्याप स्पष्ट नाही.
जोपर्यंत या कारवाईचे कारण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ही कारवाई सरकारसाठीही डोकेदुखी ठरू शकते. कामगार आणि समाज चळवळीतून उभे राहिलेले गावडे हे नेतृत्व भाजपच्या विचारसरणीच्या विरोधातले होते. मात्र राजकारणात अनेक गोष्टी अपरिहार्य असतात, आणि त्याचाच भाग म्हणून ते भाजपात दाखल झाले. गावडे सर्वप्रथम चर्चेत आले ते कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावरून. या कामात त्यांनी मंत्री म्हणून असंयमित विधाने केली. हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले असून, निविदा न काढता कंत्राट देण्यात आले होते. तत्कालीन मंत्री निलेश काब्राल गप्प राहिले, पण सगळी टीका गावडे यांच्यावर आली. त्यांनी काही कलाकारांबाबत आक्षेपार्ह विधाने करून अनावश्यक टीका ओढवून घेतली. विधानसभेत ताजमहालचे उदाहरण देत “शहाजहानने निविदा मागवली होती का?” असे वक्तव्य करून ते वादात सापडले.
कला अकादमीच्या वादात ते खरोखरच गुंतले होते की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे तेच सांगू शकतात. दोना पावला येथील त्यांच्या बंगल्याचे काम अकादमीच्या कंत्राटदाराकडून होत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यानही त्यांची विधाने वादग्रस्त ठरली. आदिवासी नेते असूनही त्यांना आदिवासी कल्याण खाते देण्यात आले नाही. त्यांनी त्या खात्याच्या कारभारावर टीका करून स्वतःच संकट ओढवून घेतले. मुख्यमंत्री सावंत यांनी गावडे यांना हटवण्याचा निर्णय स्वतःचा असल्याचे जाहीर केले. आता गावडे यांची खरी कसोटी आहे. त्यांना कला अकादमी, क्रीडा स्पर्धा आणि आदिवासी कल्याण खात्यावरील वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल. हे डाग तसेच ठेवून पुढे गेले, तर आरोपांचीच पुष्टी होईल. पण त्यांनी खरे बोलण्याचे धाडस केले, तर गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, हे निश्चित.

  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांत अंतर्गत स्पर्धा आहेत. या स्पर्धांना दोन्ही गटांकडून खतपाणी घालण्यात येईल आणि त्यातून कोण बाजी मारतो यावरच अधिवेशनाचा निकाल ठरणार आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

    झारीतील शुक्राचार्य कोण?

    चिंबलातील युनिटी मॉलविरोधी आंदोलन, आझाद मैदानावरील आंदोलन आणि आता मिराबाग येथे सुरू असलेले आंदोलन या सगळ्यांकडे पाहता या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकारातीलच काही नेते सरकारातीलच आपल्या प्रतिस्पर्धी किंवा पक्षासाठी निरुपयोगी…

    You Missed

    05/03/2026 e-paper

    05/03/2026 e-paper

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    04/03/2026 e-paper

    04/03/2026 e-paper

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार