जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

जेन झीला समजून घेण्याऐवजी तिला “संस्कार” शिकविण्याच्या नावाखाली चौकटीत बसविण्याचा प्रयत्न झाला, तर तो केवळ एका पिढीचा पराभव ठरणार नाही, तर मुक्त विचारांच्या लोकशाहीचाही पराभव ठरेल.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर उसळलेल्या जेन झीच्या आंदोलनाने भारतीय राजकारणाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. हा संदेश केवळ विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा नव्हता, तर डिजिटल युगातील नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचा होता. या आंदोलनानंतर सत्ताधारी व्यवस्थेच्या संवादशैलीत झालेला अचानक बदल हा योगायोग मानणे कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी-शैलीतील व्हिडिओंची मालिका, त्याच धर्तीवर राज्यांतील भाजप नेत्यांचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील नव्या प्रकारचा संवाद हे सर्व जेन झीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचेच संकेत मानले जात आहेत.

परंतु या बदलासोबतच आणखी एक नॅरेटिव्ह उभे राहताना दिसत आहे. आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करणाऱ्या काही युवक-युवतींचे माफी मागणारे व्हिडिओ, आपण “भरकटलो” किंवा “फसलो” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आणि त्याच वेळी पंतप्रधानांनी “अज्ञानामुळे असे घडले” असे म्हणत पालक व शिक्षकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत, असे केलेले आवाहन. या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज आहे. या संदेशांमधून नकळत असा अर्थ तर पोहोचवला जात नाही ना की आंदोलनात सहभागी झालेली तरुणाई ही असभ्य, असंस्कृत आणि दिशाहीन आहे?

या प्रश्नाचे महत्त्व यासाठी वाढते की दुसऱ्या बाजूला आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत गंभीर आरोपही समोर आले आहेत. आंदोलकांवर पोलिसी बळाचा कथित वापर, बाहेरील समाजकंटकांचा सहभाग, दगडफेक, खिळे असलेल्या लाठ्या किंवा इतर साधनांच्या वापराबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते. मात्र एवढे निश्चित की अशा घटना लोकशाहीवरील विश्वासाला धक्का देतात आणि त्यामुळे पारदर्शक चौकशी अत्यावश्यक ठरते.

जेन झीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची कल्पकता आणि डिजिटल संवादाची क्षमता. कोट्यवधी रुपयांच्या प्रचारयंत्रणेसमोर मोबाईल फोन आणि सर्जनशीलतेच्या बळावर उभे राहण्याची क्षमता या पिढीने दाखवून दिली आहे. त्यामुळेच आता संघर्ष केवळ रस्त्यावर नाही; तो सोशल मीडियावर, जनमतावर आणि नॅरेटिव्हवरही सुरू आहे.

भारतीय समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेगळा विचार करणारा तरुण असभ्य असतो का? प्रत्येक सरकारविरोधी आवाज दिशाभूल झालेला असतो का? लोकशाहीत असहमती हा गुन्हा नसतो; ती लोकशाहीची ताकद असते. जेन झीला समजून घेण्याऐवजी तिला “संस्कार” शिकविण्याच्या नावाखाली चौकटीत बसविण्याचा प्रयत्न झाला, तर तो केवळ एका पिढीचा पराभव ठरणार नाही, तर मुक्त विचारांच्या लोकशाहीचाही पराभव ठरेल. संवाद, सहिष्णुता आणि चिकित्सक विचार हीच या नव्या पिढीशी जोडण्याची खरी भाषा आहे; उपदेश किंवा शिक्कामोर्तब नव्हे.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure