खाण अवलंबित, ग्रामस्थ आमनेसामने

सरकारच्या मतलबी धोरणावर तीव्र नाराजी

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)

राज्यात खाण व्यवसाय पूर्ववत होण्याची गरज असली तरी सरकार मात्र मतलबी धोरण राबवून ग्रामस्थांतच भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका डिचोली खाण भागातील लोकांनी केली आहे. वाहतूकदार, ग्रामस्थ, कंपनीचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावून सगळे विषय मार्गी लावून खाण व्यवसाय सुरू व्हावा, अशी भूमिका या लोकांनी बोलून दाखवली आहे.
सरकारकडून कोंबड्यांची झुंज
कोंबड्यांची झुंज लावून मजा बघण्याचे काम सरकार करत आहे, अशी नाराजी पिळगांव आणि मयेवासियांनी व्यक्त केली आहे. खनिज वाहतुकीचा त्रास स्थानिकांना होऊ नये तसेच स्थानिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. खनिज वाहतूकीला विरोध करणाऱ्यांविरोधात सरकार खनिज वाहतूकदारांना पुढे करून आपापसातच लोकांची भांडणे लावत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. खाण कंपन्यांनी कामगारांना परत सेवेत घ्यावे, अशी अट सरकारने मान्य केली होती. ती अट पूर्ण न करता जे कामगार सेवेत आहेत, त्यांना पुढे करून पुन्हा सरकार ग्रामस्थांतच मतभेद निर्माण करण्याचा खटाटोप करत आहे.
शिरगांवची मंदिरे, अडवलपालची घरे
शिरगांवचे श्री देवी लईराईचे मंदिर तसेच अन्य धार्मिक स्थळे आणि घरे तसेच अडवलपाल येथीलही घरे लीज क्षेत्राबाहेर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची पूर्तता का नाही झाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खाण कंपन्या अशा गोष्टींना हात लावणार नाही, असे शाब्दीक आश्वासन देऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खाण व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे सगळे विषय सोडवण्याची गरज आहे. ग्रामस्थांत भांडणे लावून आणि आपापसात गट तयार करून खाणी सुरू करण्याचा सरकारचा विचार असेल तर तो महागात पडेल, असा इशाराही पिळगांववासियांनी दिला आहे.

  • Related Posts

    विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

    इंडि आघाडीच्या एकजुटीचा धुव्वा पणजी,दि.२२(प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र वावरलेल्या विरोधकांच्या एकजुटीचा धुव्वा उडाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेले विजय सरदेसाई यांना विरोधकांनीच एकाकी सोडल्याने…

    विरोधकांकडून सरकारला मोकळे रान

    युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता गप्प का? पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या अनेक गोष्टींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त बनली असतानाही विरोधक मात्र सरकारवर वचक ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रमुख विरोधी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    22/01/2025 e-paper

    22/01/2025 e-paper

    धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

    धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

    सावित्री गावडे हीला न्याय मिळणार ?

    सावित्री गावडे हीला न्याय मिळणार ?

    विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

    विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

    विजयबाब संयमाने घ्या…

    विजयबाब संयमाने घ्या…

    मनोज परब आगे बढो…

    मनोज परब आगे बढो…
    error: Content is protected !!