खाण अवलंबित, ग्रामस्थ आमनेसामने

सरकारच्या मतलबी धोरणावर तीव्र नाराजी

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)

राज्यात खाण व्यवसाय पूर्ववत होण्याची गरज असली तरी सरकार मात्र मतलबी धोरण राबवून ग्रामस्थांतच भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका डिचोली खाण भागातील लोकांनी केली आहे. वाहतूकदार, ग्रामस्थ, कंपनीचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावून सगळे विषय मार्गी लावून खाण व्यवसाय सुरू व्हावा, अशी भूमिका या लोकांनी बोलून दाखवली आहे.
सरकारकडून कोंबड्यांची झुंज
कोंबड्यांची झुंज लावून मजा बघण्याचे काम सरकार करत आहे, अशी नाराजी पिळगांव आणि मयेवासियांनी व्यक्त केली आहे. खनिज वाहतुकीचा त्रास स्थानिकांना होऊ नये तसेच स्थानिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. खनिज वाहतूकीला विरोध करणाऱ्यांविरोधात सरकार खनिज वाहतूकदारांना पुढे करून आपापसातच लोकांची भांडणे लावत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. खाण कंपन्यांनी कामगारांना परत सेवेत घ्यावे, अशी अट सरकारने मान्य केली होती. ती अट पूर्ण न करता जे कामगार सेवेत आहेत, त्यांना पुढे करून पुन्हा सरकार ग्रामस्थांतच मतभेद निर्माण करण्याचा खटाटोप करत आहे.
शिरगांवची मंदिरे, अडवलपालची घरे
शिरगांवचे श्री देवी लईराईचे मंदिर तसेच अन्य धार्मिक स्थळे आणि घरे तसेच अडवलपाल येथीलही घरे लीज क्षेत्राबाहेर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची पूर्तता का नाही झाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. खाण कंपन्या अशा गोष्टींना हात लावणार नाही, असे शाब्दीक आश्वासन देऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खाण व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे सगळे विषय सोडवण्याची गरज आहे. ग्रामस्थांत भांडणे लावून आणि आपापसात गट तयार करून खाणी सुरू करण्याचा सरकारचा विचार असेल तर तो महागात पडेल, असा इशाराही पिळगांववासियांनी दिला आहे.

  • Related Posts

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    मडगाव,दि.२२ जून : कारे कायदा महाविद्यालयातील बीएएलएलबी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत तत्कालीन प्राचार्य साबा डीसिल्वा यांना जबाबदार धरण्यात आले असून, विद्या विकास मंडळाने त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितल्याची…

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan filmmaker Sainath S. Uskaikar’s documentary ‘Waai’ has won the prestigious Silver Conch for Best Documentary at the Mumbai International Film Festival (MIFF), an honour regarded as one of Asia’s leading festivals. The film, produced by Bharatbala, chronicles the lives of the last four Waai singers in India.

    You Missed

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    EIE Welcomes Supreme Court Verdict on Pedestrian Rights, Demands Removal of Casino Encroachments

    EIE Welcomes Supreme Court Verdict on Pedestrian Rights, Demands Removal of Casino Encroachments