“कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन!

अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण गुरुवार, २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.

तळ कोकणचे सौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैलीच्या संवर्धनाचा ध्यास

पर्यटनाच्या माध्यमातून तळ कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनोखा अनुभव देत, प्रसाद गावडेंनी संपूर्ण जगाचे लक्ष कोकणवर केंद्रित केले आहे. रोजगार आणि करिअरच्या शोधात शहरांकडे धावणाऱ्या कोकणवासियांना स्वतःच्या भूमीत राहून उज्ज्वल भविष्य घडवता येते, तसेच जगण्याचा खरा आनंदही लुटता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

स्वतः चांगल्या पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून कोकणच्या संस्कृती आणि पर्यावरणीय मूल्यांचे संवर्धन करण्याचा मार्ग स्वीकारत त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येक कोकणवासीयांना आपल्या भूमीची ओढ निर्माण झाली, तसेच अनेक युवकांनी हा मार्ग स्वीकारण्याची मानसिक तयारी केली आहे—हेच त्यांच्या कार्याचे मोठे फलित म्हणावे लागेल.

कोकणच्या खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि शेतीचा प्रचार

त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते कोकणातील खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि शेती याबद्दल माहिती देतात. त्यांचे कार्य कोकणच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, तसेच त्यांनी स्थानिक प्रश्न प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडण्याचे कार्यही केले आहे.

त्यांचे अथक प्रयत्न आणि कोकणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली योगदान निश्चितच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!

  • Related Posts

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    “महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा.” जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र…

    गोव्याला प्रसिद्धी नव्हे,उत्तरदायी प्रशासन हवे! जॉन्सन डिसिल्वा

    सरकारवर टीका करणे म्हणजे गोव्यावर टीका करणे नव्हे. सरकारला प्रश्न विचारणारा नागरिक हा राज्याचा शत्रू नसतो. उलट, प्रश्न विचारणारे नागरिकच लोकशाही जिवंत ठेवतात. गोव्याला प्रसिद्धीची नव्हे, तर चांगल्या प्रशासनाची आणि…

    You Missed

    25/08/2026 e-paper

    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper