महापौरांची जमीन; अरे बाप रे !

ताळगांव शेतजमिनीतील अनधिकृत बांधकाम ? भरारी पथकाने घेतली माघार!

गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार एका स्थानिकाने भरारी पथकाकडे केली. चौकशीदरम्यान, ही जमीन पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नावे असल्याचे लक्षात आल्यानंतर भरारी पथकाने कोणतीही कारवाई न करता माघार घेतल्याची घटना घडली.
विटो गोम्स यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत भरारी पथक, कृषी खात्याचे तिसवाडी क्षेत्रीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. ताळगावच्या भातशेतीच्या जमिनीवर मातीचा भराव टाकून तिथे कॉंक्रिटचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी तलाठ्याकडे निवेदनाद्वारे मांडले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अलीकडेच दिलेल्या निवाड्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारींसाठी अधिकृत मोबाईल क्रमांक जाहीर केले असून, त्यावरही ही तक्रार पाठविण्यात आली. तलाठ्याकडून तक्रारदाराला संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात आली. मात्र, खंडपीठाच्या आदेशानुसार एका तासात कारवाई करणे अपेक्षित असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रारदाराची भावना आहे.
रोहित मोन्सेरात यांच्या नावे जमीन
तक्रार दाखल झालेली जमीन ही पणजीचे महापौर तसेच महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्या नावे नोंद आहे. ताळगाव कोमुनिदादच्या नावे असलेल्या या शेतीत केवळ एकच सर्वे क्रमांक त्यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जमीन १९९९ साली विकत घेतल्याची नोंद त्यांच्या एका चौदाच्या उताऱ्यावर आढळते. मात्र, रोहित मोन्सेरात हे त्या वेळी केवळ १० वर्षांचे असताना त्यांनी ही जमीन कशी विकत घेतली, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
सरकारच्या भूमिकेवर सवाल
खंडपीठाच्या आदेशानंतरही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचे आरोप होत आहेत. आदेश हा सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू आहे आणि आमदार, मंत्र्यांच्या कुटुंबियांना त्याचा अपवाद आहे का? याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी विटो गोम्स यांनी केली आहे.

  • Related Posts

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे…

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 19 views
    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 13 views
    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 32 views
    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper