मनोज परब व इतरांविरोधात गुन्हे दाखल

पिर्ण येथील घटनेवरून कोलवाळ पोलिसांची कारवाई

गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

पिर्ण येथे रस्ता रूंदीकरणाच्या विषयावरून मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची जीएसटी उत्सव फेरीदरम्यान अडवणूक करून त्यांच्या विरोधात लोकांना चिथावल्याचा आरोप कोलवाळ पोलिसांनी आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब आणि इतरांवर ठेवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना मनोज परब यांनी सांगितले की, “पोलिसांची ही कृती आम्हाला रोखू शकणार नाही. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत राहणार आहोत.”
ही घटना पिर्ण-बार्देश येथे घडली. रस्ता रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असलेल्या लोकांच्या घरांना व दुकानांना पाडण्यासंबंधी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. या विषयावर ग्राम विकास समिती आणि पंचायत ग्रामसभेत चर्चा झाली होती. त्यावेळी आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्टीकरण द्यावे, असा ठराव करण्यात आला होता. मात्र, हळर्णकर हे लोकांना सामोरे जाणे टाळत असल्याचा समज ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
जीएसटी उत्सवाच्या निमित्ताने आमदार हळर्णकर पिर्ण गावात येणार असल्याचे कळल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना नोटिसांबाबत प्रश्न विचारण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मनोज परब यांनी दिली. आमदारांना पोलिस संरक्षण घेऊन कार्यक्रमस्थळी यावे लागले, यावरूनच ते लोकांना घाबरत असल्याचे सिद्ध होते, असे परब म्हणाले.
कोलवाळ पोलिस स्थानकावर गर्दी
कोलवाळ पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तराज राणे यांनी मनोज परब यांच्यासह इतरांना समन्स जारी करून मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले. या समन्सनुसार मनोज परब आणि इतरांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्यावर काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये यापुढे सहभागी न होणे आणि तपासात सहकार्य करणे यांचा समावेश आहे.
ही तक्रार स्वानंद प्रभू यांच्या माहितीवरून दाखल करण्यात आली असून, आरोपींमध्ये तुकाराम उर्फ मनोज परब, सुबोध कांदोळकर, सिप्रियानो परेरा, अंकुश पार्सेकर, सिताराम सातार्डेकर, संजय देसाई, रोहन कळंगुटकर आणि इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.

“लोकांच्या प्रश्नांना उत्तरे न देता गप्प राहणे आणि लोकांनी प्रश्न विचारल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक करणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिसांचा बळ वापरून सरकार आपले तोंड बंद करू शकत नाही. हा लढा सुरूच राहणार आहे आणि अन्यायाविरोधात झुंजत राहणार आहे. पोलिसी कारवाईचा धाक दाखवून आता हा आक्रोश शांत होणार नाही.”
— मनोज परब

  • Related Posts

    फोंड्यावर २०२७ ची चाचपणी

    अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल गांवकरी, दि. ३० (प्रतिनिधी) फोंडा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चाचपणी घेण्याचे ठरवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या…

    मिराबाग बंधारा अखेर रद्द

    मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेगांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) मिराबाग बंधारा प्रकल्प नियोजित स्थळी होणार नाही. हा प्रकल्प रद्द करण्याबाबत संबंधित फाईलवर शेरा मारून त्यानंतर खात्यातर्फे अधिकृत लेखी पत्र आंदोलकांना दिले जाईल,…

    You Missed

    फोंड्यावर २०२७ ची चाचपणी

    • By Gaonkaari
    • मार्च 31, 2026
    • 14 views
    फोंड्यावर २०२७ ची चाचपणी

    31/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 31, 2026
    • 34 views
    31/03/2026 e-paper

    गोव्याला गरज ग्रामरक्षकांची

    • By Gaonkaari
    • मार्च 31, 2026
    • 17 views
    गोव्याला गरज ग्रामरक्षकांची

    30/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 30, 2026
    • 18 views
    30/03/2026 e-paper

    आंदोलकांसह मुख्यमंत्री जिंकले !

    • By Gaonkaari
    • मार्च 30, 2026
    • 19 views
    आंदोलकांसह मुख्यमंत्री जिंकले !

    मिराबाग बंधारा अखेर रद्द

    • By Gaonkaari
    • मार्च 30, 2026
    • 20 views
    मिराबाग बंधारा अखेर रद्द