लुथ्रा बंधूंना गोव्यात आणले… पुढे काय?

पोलिस कारवाईकडे सर्वांच्या नजरा

गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

हडफडे येथील वादग्रस्त बर्च बाय रोमीओ लेनचे मालक सौरव आणि गौरव लुथ्रा यांना अखेर आज पोलिसांनी गोव्यात आणले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना हणजूण पोलिस स्थानकात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे.
हडफडेतील अग्निकांडानंतर हे दोघे बंधू रातोरात दिल्लीमार्गे थायलंडला पळाल्याचे सांगण्यात येते. गोवा पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून लुक-आऊट नोटीस बजावल्यानंतर त्यांना फुकेट येथे ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारच्या मदतीने थायलंड सरकारशी चर्चा करून त्यांना भारतात पाठविण्याची सोय करण्यात आली. काल ते दिल्लीत दाखल झाले, तर आज सकाळी त्यांना दिल्लीतून गोव्यात आणण्यात आले. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचे पथक सकाळी १०.३० वाजता त्यांना घेऊन दाखल झाले.

लुथ्रा बंधूंना कुणाचे प्रोटेक्शन?
हडफडे येथील मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दीवकर यांनी ही जमीन सुरेंद्रकुमार खोसला यांना विक्री कराराद्वारे दिली होती. हा करार रद्द करण्यासाठी जमीनमालकांनी नोटीस बजावली होती; मात्र हे प्रकरण गेली २० वर्षे न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील खोसला यांनी ही जागा बेकायदेशीररीत्या लीजवर दिली असून सरकारी खात्यांनी ती लीज स्वीकारून विविध परवाने दिले आहेत.
लुथ्रा बंधूंनी ही जागा खोसला यांच्याकडूनच लीजवर घेतली आहे. त्यामुळे या लीजच्या विषयाचा सखोल तपास आता सुरू होणार आहे. किनारी भागात राजकीय आशीर्वादाशिवाय व्यवसाय करणे अशक्य असल्याने लुथ्रा बंधूंचा राजकीय गॉडफादर कोण, हे तपासातून उघड होण्याची शक्यता आहे. परवाने नसताना हा नाईटक्लब सुरू होता, याबाबत लुथ्रा बंधू पोलिस तपासात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुणाला देत होते हप्ते?
किनारी भागातील स्पा, मसाज पार्लर, नाईटक्लब, पब आदींकडून दर महिन्याला हप्ते गोळा केले जातात, अशी जोरदार चर्चा आहे. लुथ्रा बंधूंकडून हे हप्ते कोण गोळा करत होते, याची माहिती पोलिस मिळवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा तपास नेमका कोण करणार, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे दिल्लीवाल्यांशी साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिस राजकीय दबावाखाली खरोखरच निपक्षपातीपणे तपास करू शकतील का, याबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

  • Related Posts

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे…

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 19 views
    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 13 views
    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 38 views
    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper