राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

पेडणे,दि.२५ जून: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) वरील उगवे आणि तांबोसे दरम्यान असलेल्या तांबोसे पुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका डंपरमधून अचानक मोठमोठे दगड महामार्गावर कोसळू लागल्याने वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही क्षणांचा फरक असता तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दगडांनी भरलेला डंपर मर्यादेपेक्षा अधिक माल घेऊन भरधाव वेगाने जात होता. डंपरवरील दगड झाकण्यासाठी कोणतीही ताडपत्री किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. पुलावरील चढ-उतार आणि वाहनाच्या वेगामुळे डंपरमधील मोठे दगड मागील बाजूने थेट महामार्गावर पडू लागले.

पावसाळ्याचे वातावरण असल्याने सुरुवातीला मागून येणाऱ्या वाहनचालकांना नेमके काय घडत आहे हे समजले नाही. काही क्षणांसाठी दगडांचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचा भास निर्माण झाला. वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून वाहने थांबविल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओव्हरलोड वाहतूक, माल सुरक्षितपणे न झाकणे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे इतर वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित डंपर चालक आणि मालकावर कठोर कारवाई करावी, तसेच राष्ट्रीय महामार्गावर अशा निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

  • Related Posts

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Social and environmental activist Prof. Ramrao Wagh has called upon the people of Goa to unite against the State Government’s proposal to declare 56 villages as “Urban Areas”, warning that the move would irreversibly damage Goa’s rural character, agriculture and fragile environment.

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    अनेक कार्यालयांत अधिकारी वेळेत उपलब्ध नसतात. परिणामी नागरिकांना मंत्री, आमदार किंवा विशेष शिबिरांचा आधार घ्यावा लागतो. लोकशाही व्यवस्थेत ही पद्धत आदर्श मानता येणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी…

    You Missed

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    25/06/2026 e-paper

    25/06/2026 e-paper

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    नामस्मरण !

    नामस्मरण !