बटेंगे तो खत्म होंगे…

गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

कष्ट, मेहनत, संघटना आणि चिकाटी या बळावर निवडणूका जिंकण्याची संस्कृती काँग्रेस पक्षात नाही. देशात स्वातंत्र्य चळवळीचा वारसा खांद्यावर घेऊन राजकारणात यश मिळवलेल्या काँग्रेसने आपली स्वतंत्र संघटना, विचारधारेचा प्रसार आदींसाठी विशेष लक्ष कधीच दिले नाही. सत्ता ही कायम आपल्याकडेच राहणार असा काहीसा भ्रम या पक्षाला झाला आणि त्याचे पर्यावसान म्हणून की काय आता एकापाठोपाठ एक राज्य काँग्रेस पक्ष सत्ता गमावत चालला आहे. महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत महायुतीने एतिहासिक विजय मिळवला आहे. बहुमताच्या १४४ जागांतील भाजपने १२० पर्यंत आघाडी घेतली आहे यावरून भाजपने एकहाती हे राज्य आपल्या कब्ज्यात मिळवले आहे. प्रचंड मेहनत, रणनिती, संघटना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची नेहमीच ताकद राहीलेली आहे. एवढे करून आघाडी सरकारचा फॉर्म्यूलाही भाजपने यशस्वी करून दाखवत सत्तेसाठी सोबत आणलेल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेणे आणि त्यांना बरोबर ठेवणे हे भाजपलाच जमलेले आहे. भाजपने स्वबळावर बहुमताच्या जवळील आकडा पार केलेला असला तरी शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाला सोबतीला घेऊन त्यांनी नकळतपणे विरोधकांना कमकुवत बनवले हीच तर त्यांची रणतिनी. सर्वांत मोठा पक्ष या नात्याने सरकारचे नेतृत्व भाजपच करणार आहे आणि इतर सोबतींना सत्तेत चिकटून राहण्यासाठी भाजपची हुजरेगिरी मान्य करावी लागेल, हे देखील तेवढेच खरे. लोकसभा निवडणूकीच्या काळात इंडिया आघाडीचा फॉर्म्यूला वापरून काँग्रेसने कसेबसे आपले अस्तित्व राखले खरे परंतु भाजपला पराभूत करण्यासाठी इतरांना सोबत घेण्याबाबत काँग्रेसची कजुंषी काही लपून राहीलेली नाही. पक्षाच्या नेत्यांना अजूनही स्वबळाच्या ताकतीचा घमेंड आहे परंतु पक्षांतर्गत मतभेद, संघर्ष आणि पाय ओढण्याची जुनी संस्कृती तशीच असल्याने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची सवयच काँग्रेसला लागून राहीलेली आहे. कर्नाटकात सत्ता गमावल्यानंतर भाजपने महाराष्ट्र काबीज करण्याचा चंगच बांधला होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्राच्या भवितव्याचा जयघोष करणाऱ्या ठाकरेंना स्वतःला एकत्र येणे जमत नाही तिथे विरोधकांना ते एकत्र कसे काय आणू शकतील. उध्दव आणि राज ठाकरे यांनी खरेच महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा यासारखा दुसरा सुवर्णक्षण असूच शकत नव्हता. शरद पवारांचे आता वय झाल्यामुळे अजित पवारांना पुढील राजकीय भवितव्यासाठी त्यांच्या कलाने वागणे परवडणारे नव्हते आणि एकनाथ शिंदे यांनी तर ठाकरेंच्या पक्षातील वर्चस्वालाच सुरूंग लावून मराठी माणसाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे घेतली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने इतर भाजप विरोधकांनाही जुळवून घ्यावेच लागेल अन्यथा बटेंगे तो खत्म होंगे, हे काँग्रेसने आता लक्षात घ्यायला हवे. गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

  • Related Posts

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय केवळ शुल्कमाफीमुळे प्रवेशसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असे गृहीत धरणे धाडसाचे ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना-२०२६ अंतर्गत मुलींना…

    अंमलबजावणीच ठरेल खरी परीक्षा!

    तर हा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या जनहितकारी निर्णयांपैकी एक ठरू शकतो. गोव्यातील घरांचा प्रश्न हा केवळ चार भिंतींचा विषय नाही; तो सुरक्षिततेचा, स्वाभिमानाचा आणि पुढील…

    You Missed

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    02/07/2026 e-paper

    02/07/2026 e-paper

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    मोफत शिक्षण आणि वास्तव ?

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    GPCC Submits Memorandum to Governor, Seeks Urgent Intervention Over Goa’s Law and Order Situation

    01/07/2026 e-paper

    01/07/2026 e-paper

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर

    सरकारची ‘म्हाजो फ्लॅट’ योजना जाहीर