भाजपच्या पत्रिकेत टीसीपीची साडेसाती!

पक्ष आणि सरकारात चिंतेचे वातावरण

गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)

राज्यातील भाजपचे सरकार यापूर्वी २००५ मध्ये कोसळण्याला नगर नियोजन खातेच जबाबदार ठरले होते. आता ह्याच खात्याच्या वादग्रस्त कलमांवरून भाजप सरकारविरोधात जनतेचा रोष सुरू झाला आहे. भाजपच्या पत्रिकेतील नगर नियोजन खात्याच्या या साडेसातीला दूर करण्यासाठी नेमके काय करावे, अशा विवंचनेत पक्ष आणि सरकार सापडले आहे.
सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी नगर नियोजन खात्याच्या वादग्रस्त कलम १७(२) आणि ३९(ए) अंतर्गत झोन बदल आणि भूवापर बदल केलेली सांतआंद्रे मतदारसंघातील सर्व प्रकरणे रद्द करण्यात यावीत, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे.
मंगळवार, ६ जानेवारी रोजी पणजीतील विशाल जनसभेतही ही कलमे ताबडतोब रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर आज बुधवार, ७ जानेवारी रोजी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही कलमे रद्द करण्यात यावीत, असे नव्याने निवेदन सादर केले. यापूर्वी त्यांनी सादर केलेल्या निवेदनाला त्यांच्या सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले होते.
पेडणे तालुक्यात या दोन्ही कलमांतर्गत सुमारे ६० लाख चौ.मी. जमिनीचे रूपांतर झाले आहे. या रूपांतराचे भीषण आणि गंभीर परिणाम पेडणे तालुक्यावर होणार असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
सगळे काही कायदेशीरच…
गोवा विधानसभेत मंजूर झालेली विधेयके कायदा होऊन त्या कायद्याअंतर्गतच निर्णय घेतले जात आहेत. कुठलीच गोष्ट कायद्याच्या कक्षेबाहेरील नाही, अशी प्रतिक्रिया नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
करमळी येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस जारी करून कामबंदची नोटीस देण्यात आली आहे. करमळीवासियांनी आंदोलन केले असता या प्रकल्पासाठी सर्व परवाने मिळवल्याचा दावा मुख्य नगर नियोजकांनी केला होता.
आता परवाने जर मिळवले होते, तर मग कारणे दाखवा नोटीस आणि कामबंद नोटीशीला अर्थ काय राहतो, असा सवाल करमळीवासियांनी केला आहे. केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे. प्रकल्पाधारकाला न्यायालयात जाऊन तिथून स्थगिती मिळवून देण्याचा हा घाट आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 18 views
    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 14 views
    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 16 views
    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 17 views
    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 19 views
    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 23 views
    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???