“माझे घर” योजनेचा चतुर्थीत बोलबाला…

सरकार आणि भाजपकडून जोरदार प्रचार

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरांची मालकी आणि अतिक्रमण केलेल्या जमिनीचे अधिकार देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या “माझे घर” योजनेचा चतुर्थीच्या काळात मोठा गाजावाजा होणार आहे. सरकार आणि भाजपने या काळात योजनेच्या प्रचारासाठी आपली संपूर्ण संघटना कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आहे. सोमवारी सर्व मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांद्वारे योजनेची जोरदार जाहिरात करण्यात आली. कित्येक वर्षांपासून हक्काच्या घर आणि जमीन मालकीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण होत आहे, आणि ही गणपतीचीच कृपा आहे, असे भावनिक आवाहन करून भाजप सरकार या योजनेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ही योजना लोकांना घर आणि जमिनींची मालकी देणारी असल्यामुळे विरोधकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेला विरोध किंवा टीका केल्यास मतदार नाराज होतील आणि त्याचा लाभ भाजपला मिळेल, हे लक्षात घेऊन विरोधक सतर्क झाले आहेत. तथापि, योजनेतील अनेक बाबी प्रत्यक्षात येणे शक्य नसल्यामुळे भाजपकडून लोकांची निव्वळ फसवणूक सुरू आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तरीही सरकारच्या या डावपेचाला सार्वजनिक पद्धतीने उत्तर देण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा जयघोष
“माझे घर” योजनेच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्ते चतुर्थीच्या काळात गावोगावी घरोघरी जाऊन योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थ नेतृत्वामुळे ही अशक्य गोष्ट शक्य झाली असून, भाऊसाहेब बांदोडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे लोकांना सांगण्याचे ठरवण्यात आले आहे. ठिकठिकाणी चतुर्थीच्या काळात मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे फलक, धन्यवादाचे संदेश आणि जयघोषांचे आयोजन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
योजना अजूनही अधिसूचित नाही
सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासंबंधीची दुरुस्ती विधेयके राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहेत. या विधेयकांना अद्याप मंजुरी मिळालेली नसताना सरकार आणि पक्षाकडून त्याची जाहीरातबाजी सुरू झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही दोन्ही विधेयके न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकतात, याचा अंदाज घेऊनच सरकारने ही रणनीती आखली आहे.
या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना “जनतेचे विरोधक” असे संबोधून त्यांना जनतेच्या हवाली करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यामुळे या विषयावरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    चर्चा स्थगित ठेवण्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू होऊन काही दिवसही उलटले नाहीत, तोच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने युतीची…

    ‘गोंय राखण यात्रे’ साठी काँग्रेस सज्ज

    प्रदेश समिती आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक गांवकारी,दि.४ (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घोषित केलेल्या गोंय राखण यात्रेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सज्ज बनली आहे. काँग्रेस समिती आणि राज्य कार्यकारिणीच्या…

    You Missed

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 7 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 16 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 27 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 20 views
    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions