नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!

विशेषतः सरकारी कदंब आणि बालरथ बसेसपासून तपासणीची सुरुवात झाली पाहिजे. नियम मोडणारे वाहन सरकारी असो वा खासगी, कारवाई समान असली पाहिजे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा केवळ वाहतुकीचा विषय नाही, तर तो हजारो मुलांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्पष्ट नियमावली आखली आहे. मात्र, नियम सामान्य नागरिकांसाठी एक आणि सरकारी यंत्रणेसाठी दुसरे, अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या नियमांचा मूळ उद्देशच पराभूत होतो. कायदा आणि नियमांचे पालन करण्याची सुरुवात सरकारने स्वतःपासून करणे आवश्यक आहे.

गोव्यात बालरथ, कदंबच्या बसेस तसेच खासगी बस आणि इतर वाहनांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक होते. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून खासगी वाहनांची तपासणी केली जाते. नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाईही होते. ती व्हायलाच हवी. परंतु याच निकषांवर कदंब आणि बालरथ बसेसची तपासणी होते का, हा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. कायद्यापुढे सरकारी आणि खासगी असा भेद असता कामा नये.

आरटीआय कार्यकर्ते आणि वाहतूकदार सुदीप ताम्हणकर यांनी याच मुद्याकडे वाहतूक संचालकांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड थांबवावी आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर वाहतूक संचालक अरविंद खुंटकर यांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सहाय्यक वाहतूक संचालकांसह संबंधित अधिकाऱ्यांना स्कूल बस सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेशातील बाबी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठरावीक रंग व ‘स्कूल बस’ अशी स्पष्ट ओळख, स्पीड गव्हर्नर, खिडक्यांना सुरक्षा ग्रील, सुरक्षित दरवाजे, आसनाखाली स्कूल बॅग ठेवण्याची व्यवस्था, चालकांच्या पूर्वइतिहासाची आणि वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्तीची पडताळणी, तसेच विद्यार्थिनींच्या वाहतुकीवेळी पात्र महिला सहाय्यकाची उपस्थिती यांसारख्या नियमांची पूर्तता तपासण्याचे निर्देश आहेत. विद्यार्थी यादी, मार्ग परवाना आणि आपत्कालीन संपर्क नोंदीही तपासल्या जाणार आहेत.

मात्र, प्रश्न आदेश काढण्याचा नाही; त्याच्या अंमलबजावणीचा आहे. काही दिवस तपासण्या करून पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होता कामा नये. विशेषतः सरकारी कदंब आणि बालरथ बसेसपासून तपासणीची सुरुवात झाली पाहिजे. नियम मोडणारे वाहन सरकारी असो वा खासगी, कारवाई समान असली पाहिजे.

समाजात शिस्त निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनच बेशिस्तीला मूक संमती देत असेल, तर नागरिकांकडून नियमपालनाची अपेक्षा करण्याचा नैतिक अधिकार सरकार गमावते. मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तर तडजोडीला अजिबात जागा नाही. नियम सर्वांसाठी असतील, तर ते सर्वप्रथम सरकारने पाळून दाखवावेत.

  • Related Posts

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    या उड्डाणपुलाचा खरा कस उद्घाटनाच्या दिवशी नव्हे, तर पुढील अनेक वर्षे तो हजारो वाहनांना किती सुरक्षितपणे मार्ग देतो यावर लागणार आहे. पर्वरीतील बहुचर्चित उड्डाणपुलाचे उद्घाटन आज, ९ सप्टेंबर रोजी मोठ्या…

    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    त्यामुळे कार्यालयाचे उद्घाटन हेच प्रसिद्धीचे मुख्य केंद्र बनू नये, म्हणून अमित शहा मध्येच उठून गेले तर नसतील, असा प्रश्नही उपस्थित होतो. भाजप कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अचानक…

    You Missed

    Do Not Test the Patience of Goans!

    Do Not Test the Patience of Goans!

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    09/09/2026 e-paper

    09/09/2026 e-paper

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?