समेटाच्या दिशेने आरजीपीचे पहिले पाऊल

मनोज परब यांच्याकडून माणिकराव ठाकरेंची माफी

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागितली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची आघाडी व्हावी, अशी तीव्र इच्छा आरजीपीची होती. ती फसल्याच्या नैराश्यातून माणिकराव ठाकरे यांच्याप्रती चुकीचे शब्द तोंडी आले. आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून मनोज परब यांनी नव्या समेटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागला असला तरी या निकालातून विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदाच भाजप आघाडीला होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकांनी विरोधकांनाही विश्वासाचा कौल दिला आहे आणि विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे, असा स्पष्ट संदेश या निकालातून प्रकट झाला आहे. सोमवारी जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागणारा संदेश टाकल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


आरजीपीने पुन्हा एकदा नव्याने महाविरोधी आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चेसाठी पहिले पाऊल टाकले आहे. या निवडणुकीत आरजीपीला दोन जागा मिळाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस आणि आरजीपी एकत्र आल्यास त्याचा जबर परिणाम भाजप आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच आघाडीसंबंधीची चर्चा सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.
महाविरोधी आघाडी व्हायलाच हवी – युरी आलेमाव
जिल्हा पंचायतीसाठी महाविरोधी आघाडी होणे शक्य होते, परंतु पक्षांतर्गत काही घटकांच्या नाकर्तेपणामुळे ती फसली. आपण अजूनही महाविरोधी आघाडीसाठी आग्रही आहोत. भाजपची भ्रष्ट आणि गोवाविरोधी राजवट उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी तडजोड करावीच लागेल. गोव्याचे हित आणि भविष्य लक्षात घेऊन ही आघाडी होण्याची गरज आहे. काँग्रेस श्रेष्ठीं समोर आपण ही भूमिका मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

  • Related Posts

    Unity Mall at Chimbel: When Environmental Clearance Failed Goa and Public Trust Was Betrayed

    Unity Mall at Chimbel: When Environmental Clearance Failed Goa and Public Trust Was BetrayedThe controversy surrounding the proposed Unity Mall at Chimbel is no longer confined to questions of land…

    This Path Leads Only to Ruin

    The torchlight march once led by the late Manohar Parrikar against casinos, and the subsequent permission granted to the tallest casino vessel, together highlight a transformation in the BJP’s policy…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper