मुख्यमंत्र्यांचे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान

कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील बांधकामे नियमीत करणार

गांवकारी, दि.१२ (प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी आणि कोमुनिदाद जमीनीतील बेकायदा बांधकामे नियमीत करण्यास तीव्र हरकत घेतली आहे. असे असूनही, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील बेकायदा बांधकामे नियमीत करण्यासाठी खास कायदा आणण्याची घोषणा करून अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले आहे.
आज डिचोली येथे सुमारे ८० कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत उभारण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर, आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्त्याच्या बाजूची बांधकामे हटविण्याचे काम सुरू झाल्याने काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत आहे.
आता कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील बांधकामांचा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला असताना, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या समस्येवर तोडगा म्हणून खास कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
वटहुकूम किंवा विधेयकावर नाराजी
बेकायदा बांधकामांसाठी वटहुकूम किंवा विधेयक आणून त्यांना कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यात तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने कायदे आणि नियमांची अंमलबजावणी सकारात्मकपणे करणे अपेक्षित आहे. कायद्यांचे पालन न केल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे वटहुकूम किंवा विधेयक आणून बेकायदा बांधकामांना मान्यता देण्याचे प्रकार प्रोत्साहित करता कामा नयेत, असा न्यायालयाचा स्पष्ट इशारा आहे.
सरकार अवमानाच्या कक्षेत?
मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांबाबत दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने वेळ मागितली असली, तरीही या निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्याने सरकारच्या कृतीला अवमान मानले जाऊ शकते. सरकारने वटहुकूमाची तयारी केली आहे. मात्र, या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    GPCC Opposes Inauguration of Captain of Ports Terminal, Demands Goa Maritime Board Headquarters

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has strongly objected to the proposed inauguration of the Captain of Ports Terminal, urging the Central Government to instead dedicate the facility as the headquarters of the proposed Goa Maritime Board.

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    स्मार्ट मीटर जनआंदोलनानंतर मुख्य अभियंत्यांची घोषणा गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)स्मार्ट मीटर प्रकल्पाअंतर्गत ग्राहकांकडून अतिरीक्त वीज वापरासाठी आकारण्यात आलेला तब्बल ४३ कोटी रुपयांचा दंड परत करण्याचे आश्वासन वीज विभागाचे मुख्य अभियंता…

    You Missed

    GPCC Opposes Inauguration of Captain of Ports Terminal, Demands Goa Maritime Board Headquarters

    GPCC Opposes Inauguration of Captain of Ports Terminal, Demands Goa Maritime Board Headquarters

    WRD Forwards Complaint on Alleged Illegal Excavation from Amberem Nallah in Pernem

    WRD Forwards Complaint on Alleged Illegal Excavation from Amberem Nallah in Pernem

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case