शहरीकरणाचा बेत अखेर फसला

५६ गावांच्या शहरीकरणाची अधिसूचना मागे

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या महसूल खात्याने ५६ गावांना “शहरी क्षेत्र” घोषित करण्याच्या प्रस्तावाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने महसूल खात्याने अखेर ही अधिसूचना मागे घेतली आहे. महसूल खात्याने त्यासंबंधीचे पत्र पंचायत संचालकांना पाठवले आहे. शहरीकरणाचा हा वणवा राज्यभरात पेटेल हे ओळखूनच अखेर सरकारने हा बेत रद्द केला.
महसूल खात्याने यासंबंधीची अधिसूचना १० मे २०२६ रोजी जारी केली होती. या प्रस्तावात बार्देशमधील १६, सासष्टीतील १०, तिसवाडी व फोंड्यातील प्रत्येकी ९, पेडणे व मुरगावातील प्रत्येकी ४ तसेच डिचोली, सत्तरी, केपे आणि सांगे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश होता.
सरकारची शरणागती म्हणजेच लोकांच्या एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. “कुठल्याही विषयावर जनता एकत्र आली तर सरकारला नमते घ्यावेच लागते,” असेही ते म्हणाले.
२०२० मध्येही याच गावांना शहरी क्षेत्र घोषित करण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे सरकारला अवघ्या २० दिवसांत अधिसूचना मागे घ्यावी लागली होती. आता मे २०२६ मध्ये पंचायत संचालनालयाने पुन्हा ग्रामपंचायतींना प्रस्ताव पाठवून एका महिन्यात सूचना सादर करण्यास सांगितले होते.
प्रा. रामराव वाघ यांनी यासंबंधीचे निवेदन सरकारला सादर केले होते. तत्पूर्वी हळदोण्याचे आमदार एड. कार्लूस फेरेरा यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला होता. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आदींनी विरोध दर्शवल्यानंतर आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनीही या शहरीकरणाला जोरदार आक्षेप घेतला.
बोरकर यांनी ह्याच विषयावरून मुख्य सचिवांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फोटो काढण्यास मनाई करण्यात आल्याने तो विषय देखील संवेदनशील बनला होता. हा विषय चिघळण्याची शक्यता सरकारला वाटल्यानेच अखेर सरकारने शनिवार असूनही ही अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय घेतला.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 13 views
    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 15 views
    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 18 views
    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 22 views
    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 17 views
    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    विकसित भारत : समृद्ध गोवा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 23 views
    विकसित भारत : समृद्ध गोवा