पाटकर – चोडणकर संघर्षाला प्रभारी जबाबदार !

काँग्रेस हायकमांडच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)

राज्यात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती उद्भवण्यास हायकमांड आणि राज्यात पाठवले जाणारे प्रभारी जबाबदार आहेत. अमित पाटकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून गिरीश चोडणकर गटाने त्यांच्या विरोधात असहकार्याचे धोरण स्वीकारले. या संघर्षात प्रभारींनी हस्तक्षेप करून समेट का घडवून आणला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राज्यात एकीकडे भाजपच्या जुलमी राजवटीपासून लोकांना मुक्तता हवी आहे, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस मात्र अंतर्गत संघर्षात अडकला आहे. ही परिस्थिती दुर्दैवी असल्याचे पक्षातील काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत. लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याऐवजी आणि भाजपच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करण्याऐवजी काँग्रेसचे नेते दिल्लीत आपल्या पक्षातील एकमेकांचे वाभाडे काढण्यात मग्न आहेत. पक्षातील सध्याच्या घडामोडी कार्यकर्ते आणि जनतेसाठी अत्यंत निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
ठाकरे आणि निंबाळकर अपयशी
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या तीन वर्षांत तळागाळातील संघटन उभारणीसाठी ठोस पावले उचलली नाहीत. सर्वांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून यशस्वी प्रयत्न झाले नाहीत. केवळ बैठका घेणे आणि दिल्लीवरून आलेले कार्यक्रम राबविणे इतपतच त्यांची भूमिका मर्यादित राहिली, अशी स्पष्ट टीका स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.
दिल्लीत पक्ष नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर कुणालाही विश्वासात घेतले जात नसल्याची भावना निर्माण झाली आहे. पक्षाचे आमदार आणि खासदारांनाही श्रेष्ठींकडून विचारले जात नसल्यामुळे “नेमके काय चालले आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या एकूण प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. जर फक्त गिरीश चोडणकर यांनाच निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात असतील, तर उर्वरित नेते, कार्यकर्ते, विद्यमान तीन आमदार आणि खासदार यांचे नेतृत्व कौशल्य, योगदान आणि निष्ठा गौण ठरते का? तळागाळात काम करणारे इतर नेते हायकमांडच्या नजरेत का येत नाहीत? भाजपविरोधातील जनतेची नाराजी असूनही काँग्रेसला त्याचा लाभ घेता आलेला नाही. गटबाजी आणि निष्क्रियतेमुळे पक्ष भरकटत चालला आहे.
आज जर काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर व्यक्तिनिष्ठ निर्णय न घेता सामूहिक नेतृत्व आणि तळागाळातील नेते व कार्यकर्त्यांचा सन्मान हीच खरी गरज आहे, असा ठाम सूर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात उमटत आहे.

  • Related Posts

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    The Bombay High Court has issued an interim order restraining the further circulation of statements made in a video allegedly defamatory to House of Abhinandan Lodha Private Limited (HOABL). The order was passed during a hearing of an interim application against activist Swapnesh Sherlekar, with the court also granting permission to amend the plaint to include another individual.

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    Social activist and lawyer Aires Rodrigues urged Goans to preserve communal harmony, secularism, and peaceful coexistence, highlighting Goa’s tradition of unity and warning against divisive forces.

    You Missed

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    09/05/2026 e-paper

    09/05/2026 e-paper

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार